शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जनसामान्यांच्या मनातील नेतृत्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रत्येक गावा-गावात आहे. कोरोनाच्या महामारीत लाखो लोक ...

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रत्येक गावा-गावात आहे. कोरोनाच्या महामारीत लाखो लोक बेरोजगार बनले. अनेकांचे व्यवसाय बुडाले. कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य माणूस कोरोनाबाधित झाल्यावर त्याला ऑक्सिजनच काय, बेड सुद्धा मिळत नाही. उपचाराअभावी त्याचा मृत्यू होत आहे. या संकटसमयी दानशूर वनश्री नानासाहेब महाडिक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. समाजकार्य कसे करायचे, संकटात लोकांना मदत कशी करायची हे त्यांनी दाखवून दिले असते.

सर्वसामान्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नाना सदैव तत्पर असायचे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत नानासाहेबांनी कार्याचा दबदबा निर्माण केला होता. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण करण्यालाच महत्त्व दिले.

वाळवा तालुक्यातील पेठ येथे नानासाहेब सर्वसामान्य माणूस असो वा राजकारणी, त्यांना मदत करायचे. नानांकडे कोणीही मदत मागायला गेले आणि रिकाम्या हाताने परत आले, असे कधी घडले नाही. गोरगरिबांना त्यांच्या असण्याचा मोठा आधार होता. सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नाना नेहमी प्रयत्न करत होते. तालुक्यातीलच काय, जिल्ह्यातील भांडण-तंटे मिटविण्यासाठी अनेक नागरिक नानांकडे गेले की, जाग्यावरच त्याचा न्यायनिवाडा केला जात होता. समाजकार्य करत असताना प्रत्येक समाजात आपले जवळचे नाते निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी लागेल ती मदत करून ते युवकांना प्रोत्साहन देत होते.

ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्यासाठी नानांचा पुढाकर असे. मुस्लिम समाजासाठी रोजे व इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी वाळवा तालुक्यातील गावा-गावात अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्याचे काम त्यांनी केले. नानासाहेबांनी सर्व जाती-धर्मात एकोपा राखण्यासाठी काम केले. नानासाहेबांनी गावातील वयोवृद्ध, तरुण, महिला यांना गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. तसेच शासनाच्या विकास कामांच्या निधीसह गरज पडेल तिथे स्वतःकडील आर्थिक मदत देऊन गावाचा विकास घडवून आणला.

नानासाहेबांनी गावातील सार्वजनिक विकासाला प्राधान्य दिले. १९९० मध्ये नानासाहेबांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी भैय्या महाडिक सहकारी पतसंस्था स्थापन केली. ही संस्था नावारूपाला आल्यामुळे पुढे या संस्थेचे नामकरण नागरिकांच्या आग्रहास्तव वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी असे करण्यात आले. या संस्थेचे वाळवा, शिराळा, मिरज, कडेगाव, पलूस आदी तालुक्यांबरोबरच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जाळे निर्माण करून, लोकांना तात्काळ आर्थिक पुरवठा करणारी संस्था अशी नोंद नावारूपाला आली.

ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी कुंडलवाडी, मालेवाडी, गाताडवाडी या ठिकाणी शैक्षणिक विद्यालय सुरू केले. या ठिकाणी आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नानासाहेबांनी पेठ येथील भोंड्या माळरानावर पन्नास एकरामध्ये व्यंकटेश्वरा शिक्षण संकुल उभारले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या शिक्षण संस्थेतून अनेक नामवंत विद्यार्थी घडत आहेत. हे शैक्षणिक संकुल महाराष्ट्रामध्ये आदर्श शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आले आहे.

शैक्षणिक संकुलात के.जी.पासून पी.जी.पर्यंत, लहान मुलांसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण, इंजिनिअरिंग कॉलेज, आयटीआय कॉलेज, डी.एड्‌., बी.एड्‌. कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज सुरू केले. या कॉलेजमध्ये आज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या कॉलेजमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या जातात.

या संस्थेचे कामकाज संस्थेचे सचिव, युवा नेते राहुल महाडिक व युवा नेते सम्राट महाडिक हे पाहत आहेत. तसेच नानासाहेब यांच्या आशीर्वादाने राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी गोविंद मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकल्प कोट्यवधी रुपयांचा उभारला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील, विलासराव शिंदे, शिवाजीराव देशमुख, तसेच शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांना वेळोवेळी निवडणुकांसाठी सहकार्य करून त्यांना राजकीय ताकद देण्याचे काम नानासाहेबांनी केले.

नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून श्रीमती मीनाताई नानासाहेब महाडिक यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. तसेच पेठ (ता. वाळवा) गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रीमती मीनाक्षीताई नानासाहेब महाडिक यांनी गावाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. युवा नेते राहुल महाडिक यांनी पाच वर्षे येलूर जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. राहुल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मतदार संघातील गावातील विकासाची घोडदौड चालू आहे. येलूर गावचे निर्मलग्राम सरपंच राजन महाडिक यांनी गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गावाचे नाव राज्यात नावारूपाला आणले आहे.

तसेच पेठ जिल्हा परिषद मतदार संघातून नानासाहेबांनी युवा नेते सम्राट महाडिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. महाराष्ट्रात सर्वात लहान तरुण जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

आज पेठ जिल्हा परिषद मतदार संघातून बांधकाम सभापती म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन एक इतिहास घडवला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू सत्यजित विश्वासराव पाटील यांच्याशी नानासाहेब यांची कन्या रोहिणीताई यांचा विवाह नानासाहेबांनी शाही थाटात करून दिला होता. आज रोहिणीताई सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून सेवा करीत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी नानासाहेब यांनी प्रयत्न केले.

जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावात त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात आणून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, मार्केट कमिटी सभापती केले आहे. खासदार व आमदारकीच्या निवडणुकीत जिकडे वनश्री तिकडेच ‘विजयश्री’ असे समीकरणच बनले होते.

नानासाहेबांनी आपल्या दोन मुलांना म्हणजे राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांना सामान्य नागरिकांप्रती बांधिलकी जपण्याचा विचार दिला. नानासाहेबांचे स्वप्न होते राहुल व सम्राट महाडिक यांना शिराळा व वाळवा या विधानसभा मतदारसंघातून आमदार करण्याचे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन राहुल महाडिक व सम्राट महाडिक जनसेवा करीत आहेत. महाडिक कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्यांनी साथ दिली, तर येत्या काळात राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांना आमदार करण्याचे नानांचे स्वप्न पूर्ण होईल आणि हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!

लेखक- विजय पाटील

शब्दांकन - संजय येंगटे