शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

पुढाऱ्यांनीच पाण्याबाबत शेतकऱ्यांना गुलाम केले

By admin | Updated: April 13, 2015 00:04 IST

भारत पाटणकर यांची टीका

श्रमिक मुक्ती दल, पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर शासनाकडे रेटा लावून सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. ताकारी योजना कार्यान्वित करून आधी पाणीपट्टी घ्या आणि नंतर पाणी सोडा, हे सूत्र शेतकऱ्यांमध्ये रुजविण्याचे श्रेय श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्याकडे जाते. सिंचन योजनांच्या पाणीप्रश्नावर त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना अंशत: कार्यान्वित झाल्या आहेत. पण, थकित पाणीपट्टी व वीज बिलामुळे त्या वारंवार बंद राहात आहेत. यावर ठोस उपाय कोणते? - ताकारी उपसा सिंचन योजना सर्वप्रथम २००३-०४ च्या दुष्काळामध्ये कार्यान्वित झाली. यावेळी आम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्यापूर्वी पाणीपट्टी गोळा करून शासनाकडे भरली. त्यानंतर पाणी सोडले. पाणी सोडतानाही ‘शेपटाकडून मुखाकडे’ हे सूत्र वापरले. त्यामुळे आजही तेथे थकित पाणीपट्टीचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. पाणीचोरीही रोखली. हेच सूत्र टेंभू योजनेच्या बाबतीत वापरले. परंतु, तेथे पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे सूत्र फारसे यशस्वी झाले नाही. म्हैसाळ योजनेचे वाटोळे हे तेथील पुढाऱ्यांनीच केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्त्यांनी टंचाई नसताना तेथील वीज बिल भरून शेतकऱ्यांना फुकटात पाणी देऊन गुलाम केले. शेतकरी स्वाभिमानी असून तो पैसे भरण्यास तयार होता. तरीही त्यांना लाचार केले, ते राज्यकर्त्यांनीच. हे प्रथम बंद केले पाहिजे. म्हैसाळ योजना नियमित चालू ठेवण्यासाठी प्रथम पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून भरून घेऊन ती शासनाकडे भरावी. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नियमित पाणी सोडण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली पाहिजे.पैसे आम्ही भरतो आणि पाणी कवठेमहांकाळ, जत, सांगोला तालुक्यास का? असा मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप आहे? - पाण्याबाबत तालुक्यांमधील संघर्ष संपविण्यासाठी प्रथम पोटकालव्यांची कामे पूर्ण केली पाहिजेत. दुसरी गोष्ट ‘शेपटाकडून मुखाकडे’ पाणी देण्याचे सूत्र जसे आपण स्वीकारले आहे, तेच सूत्र पाणीपट्टी वसुलीबाबतही राबविण्याची गरज आहे. असे झाले तर तालुक्यामधील पैसे भरणे आणि पाणी सोडण्यातील संघर्षच निर्माण होणार नाहीत. यामुळे प्रशासनानेही पाणीपट्टी वसुलीकडे तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सर्वच शेतकरी पैसे भरण्यास तयार आहेत. पण, राज्यकर्तेच त्यांना पैसे भरू देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण, शेतकरी स्वाभिमानी असलेले राज्यकर्त्यांना परवडणारे नाही.ताकारी योजनेच्या बाबतीत पाणीपट्टी वसुलीचे नक्की सूत्र काय? ते यशस्वी कसे झाले?- शासनाने ठरवून दिलेलीच पाणीपट्टी शेतकरी भरत आहेत. येथेही ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलासह पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली होती. परंतु, जलसंपत्ती प्राधिकरणाकडे वीज बिलासह पाणीपट्टी वसूल करणे कसे चुकीचे आहे, ते आम्ही पटवून दिले. त्यानंतर प्राधिकरणाने वीज बिलाचा खर्च हा देखभाल खर्चाचाच एक भाग असल्याचा निकाल दिला. यामुळे सध्या तेथे वीज बिलाशिवाय, शासनाने ठरविलेल्या दरानुसारच पाणीपट्टी वसूल होत आहे. म्हैसाळ योजनेच्याबाबतीतही शासनाच्या दरानुसारच पाणीपट्टी वसूल करावी. थकित वीज बिल भरण्यासाठी मिरज, कवठेमहांकाळ, जत, सांगोला तालुक्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ते भरावे. त्यानंतर त्याचे समान भाग करून शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतून ते कारखान्याला अधिकाऱ्यांनी द्यावे. नियमित चालू बिल भरण्यासाठी आधी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करून, मागणी नोंद झाल्यानंतरच अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचा आग्रह धरला पाहिजे. असे झाले तरच या योजना नियमित कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरतील.म्हैसाळ योजनेसह अन्य योजना नियमित चालू ठेवण्यासाठी ठोस कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? - टेंभू उपसा सिंचन योजना शंभर टक्के यशस्वीरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी आम्ही बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचे धोरण स्वीकारले. तसेच हे बंद जलवाहिनीचे पाणी छोट्या-छोट्या टाक्या तयार करून ते ठिबक सिंचनद्वारे सर्व शेतीला देण्याचा शासनाकडे आग्रह धरला. तो त्यांनी मान्यही केला. त्यामुळे दुष्काळी, कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला आणि तासगाव तालुक्यातील इंच न् इंच जमिनीला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. याच धर्तीवर म्हैसाळ आणि ताकारी उपसा सिंचन योजनेच्याबाबतीत करण्याची गरज आहे. बंद जलवाहिनी आणि ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्यामुळे सर्व शेतीला पाणी मिळेल. शिवाय, पोटकालव्यांवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा बंद जलवाहिनीद्वारे पाणी देणे कमी खर्चाचे आहे. तसेच पाणीचोरीही शंभर टक्के रोखता येणार असून सर्व शेतकऱ्यांना समन्यायी पाणीवाटप करणे शक्य होणार आहे. सिंचन योजनांवर हीच ठोस उपाययोजना आहे.अशोक डोंबाळे