शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

चार गावांचा आराखडा धूळ खात

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

मिरज पंचायत समिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; संस्थेचा अनागोंदी कारभार

मिरज : केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राबविलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी निवडण्यात आलेल्या तालुक्यातील चार गावांचा कोट्यवधीच्या खर्चाचा कृती विकास आराखडा, सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेचा अनागोंदी कारभार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनास सादर होण्याऐवजी तो मिरज पंचायत समितीमध्ये धूळ खात पडला आहे. त्यामुळे चार गावांना वेळेत निधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.मिरज तालुक्यातील निर्मलग्राम योजनेत सहभाग न घेतलेल्या मालगाव, माधवनगर, बेडग व खटाव या चार गावांची या अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांत स्वच्छतेच्यादृष्टीने मंजूर होणाऱ्या कोट्यवधीच्या निधीतून गटार बांधकाम, गाव शौचालययुक्त, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन ही कामे करण्यात येणार आहेत. याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. या संस्थेने आराखडा पूर्ण केल्यानंतर तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार होता. गावातील प्रत्येक प्रभागात ग्रामसभा घेऊन, बांधावयाच्या शौचालयांची संख्या, गटारी, घनकचरा व सांडपाणी निर्मूलन या समस्यांचे सर्वेक्षण करून कच्चा आराखडा करण्याचे काम संस्थेने केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या साहाय्याने कामांचा व खर्चाचा आराखडा पूर्ण करण्याची गरज असताना, संस्थेने सर्वेक्षण केलेल्या कामांची मोजमापे, येणाऱ्या खर्चाची अंदाजे रक्कम याची कृती आराखड्यात नोंद न करता, तो अपूर्णावस्थेत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सादर केला आहे. कृती आराखडा अपूर्ण असल्याने तो शासनाकडे सादर करता आला नाही. (वार्ताहर)जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील चार गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठीचा कोट्यवधी रुपये खर्चाचा कृती आराखडा अपूर्णावस्थेत पंचायत समितीत पडून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेला हा अपूर्ण कृती आराखडा पूर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेकडे पाठपुरावा करण्याची गरज असताना, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.