शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

चार गावांचा आराखडा धूळ खात

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

मिरज पंचायत समिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; संस्थेचा अनागोंदी कारभार

मिरज : केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राबविलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी निवडण्यात आलेल्या तालुक्यातील चार गावांचा कोट्यवधीच्या खर्चाचा कृती विकास आराखडा, सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेचा अनागोंदी कारभार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनास सादर होण्याऐवजी तो मिरज पंचायत समितीमध्ये धूळ खात पडला आहे. त्यामुळे चार गावांना वेळेत निधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.मिरज तालुक्यातील निर्मलग्राम योजनेत सहभाग न घेतलेल्या मालगाव, माधवनगर, बेडग व खटाव या चार गावांची या अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांत स्वच्छतेच्यादृष्टीने मंजूर होणाऱ्या कोट्यवधीच्या निधीतून गटार बांधकाम, गाव शौचालययुक्त, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन ही कामे करण्यात येणार आहेत. याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. या संस्थेने आराखडा पूर्ण केल्यानंतर तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार होता. गावातील प्रत्येक प्रभागात ग्रामसभा घेऊन, बांधावयाच्या शौचालयांची संख्या, गटारी, घनकचरा व सांडपाणी निर्मूलन या समस्यांचे सर्वेक्षण करून कच्चा आराखडा करण्याचे काम संस्थेने केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या साहाय्याने कामांचा व खर्चाचा आराखडा पूर्ण करण्याची गरज असताना, संस्थेने सर्वेक्षण केलेल्या कामांची मोजमापे, येणाऱ्या खर्चाची अंदाजे रक्कम याची कृती आराखड्यात नोंद न करता, तो अपूर्णावस्थेत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सादर केला आहे. कृती आराखडा अपूर्ण असल्याने तो शासनाकडे सादर करता आला नाही. (वार्ताहर)जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील चार गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठीचा कोट्यवधी रुपये खर्चाचा कृती आराखडा अपूर्णावस्थेत पंचायत समितीत पडून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेला हा अपूर्ण कृती आराखडा पूर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेकडे पाठपुरावा करण्याची गरज असताना, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.