शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

चार गावांचा आराखडा धूळ खात

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

मिरज पंचायत समिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; संस्थेचा अनागोंदी कारभार

मिरज : केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राबविलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी निवडण्यात आलेल्या तालुक्यातील चार गावांचा कोट्यवधीच्या खर्चाचा कृती विकास आराखडा, सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेचा अनागोंदी कारभार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनास सादर होण्याऐवजी तो मिरज पंचायत समितीमध्ये धूळ खात पडला आहे. त्यामुळे चार गावांना वेळेत निधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.मिरज तालुक्यातील निर्मलग्राम योजनेत सहभाग न घेतलेल्या मालगाव, माधवनगर, बेडग व खटाव या चार गावांची या अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांत स्वच्छतेच्यादृष्टीने मंजूर होणाऱ्या कोट्यवधीच्या निधीतून गटार बांधकाम, गाव शौचालययुक्त, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन ही कामे करण्यात येणार आहेत. याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. या संस्थेने आराखडा पूर्ण केल्यानंतर तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार होता. गावातील प्रत्येक प्रभागात ग्रामसभा घेऊन, बांधावयाच्या शौचालयांची संख्या, गटारी, घनकचरा व सांडपाणी निर्मूलन या समस्यांचे सर्वेक्षण करून कच्चा आराखडा करण्याचे काम संस्थेने केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या साहाय्याने कामांचा व खर्चाचा आराखडा पूर्ण करण्याची गरज असताना, संस्थेने सर्वेक्षण केलेल्या कामांची मोजमापे, येणाऱ्या खर्चाची अंदाजे रक्कम याची कृती आराखड्यात नोंद न करता, तो अपूर्णावस्थेत पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सादर केला आहे. कृती आराखडा अपूर्ण असल्याने तो शासनाकडे सादर करता आला नाही. (वार्ताहर)जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यातील चार गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठीचा कोट्यवधी रुपये खर्चाचा कृती आराखडा अपूर्णावस्थेत पंचायत समितीत पडून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेला हा अपूर्ण कृती आराखडा पूर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेकडे पाठपुरावा करण्याची गरज असताना, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.