शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

वनक्षेत्रातील गवत घेण्याचा कायदा करणार

By admin | Updated: August 10, 2015 00:50 IST

हंसराज अहिर : गवळी समाजाच्या मेळाव्यात ग्वाही

सांगली : चारा नसल्यामुळेच जनावरे कत्तलखान्याकडे जातात. हे रोखण्यासाठी वनक्षेत्रातील गवत कापण्यास परवानगी देणारा कायदा लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. येथील भावे नाट्यमंदिरमध्ये रविवारी गवळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अहिर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसन गवळी होते. यावेळी खा. संजय पाटील, आ. सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते.अहिर म्हणाले की, गवळी समाजाने शिक्षणाची कास धरून आपली प्रगती करावी. केवळ नोकरीच्या मागे लागून वेळ वाया न घालवता स्वत:चा उद्योग उभारावा. दुभत्या जनावरांची संख्या घटत चालल्याने गवळ्यांचा दुधाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याला कारण जनावरांना चारा उपलब्ध नसणे हे आहे.खा. संजय पाटील म्हणाले की, गवळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आपण आवाज उठवू. आ. गाडगीळ म्हणाले, गवळी समाजाच्या न्याय्य मागण्या असून, यासाठी आपण शासकीय दरबारी प्रयत्न करू. स्वागत जिल्हाध्यक्ष नारायण गवळी यांनी केले. यावेळी अशोक मंडले, हिरामण गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, भालचंद्र हुच्चे, लक्ष्मणराव नवले, माजी महापौर शैलजा नवलाई, मारुती नवलाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेती उद्ध्वस्त होते...रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापराने भारतातील शेती उद्ध्वस्त होत असून, यापुढे शेती टिकवण्यासाठी शेणखताचा वापर होणे नितांत गरजेचे आहे, अशी माहिती अहिर यांनी दिली. रासायनिक खताने आरोग्याबरोबर शेतीही खराब होत आहे. शेणखताचा वापर सुरू केल्यास पशुधन वाढण्यात मदत होणार आहे.