शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांचा पगारवाढीने जल्लोष

By admin | Updated: June 25, 2016 01:11 IST

१५ टक्के पगारवाढ : राजारामबापू कारखान्यावर आनंदोत्सव

इस्लामपूर : राज्यातील साखर कामगारांच्या पगारात १५ टक्के वाढ व १२ महिन्यांचा फरक देण्याच्या निर्णयाने राज्यातील साखर कामगारांमध्ये ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी त्रिपक्षीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष तानाजी खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजारामबापू साखर कारखान्यातील कामगारांनी साखर वाटून जल्लोष साजरा केला़ ३१ मार्च २०१३ ला त्रिपक्षीय समितीची मुदत संपली होती़ मात्र नवी समिती गठित करण्यास बराच विलंब लागला होता़ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पुणे, कार्याध्यक्ष अविनाश काका आपटे, अहमदनगर, राऊ पाटील, रावसाहेब भोसले, कोल्हापूर, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, सोलापूर, युवराज ननवरे, इंदापूर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला़ अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री व साखर उद्योगाचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रयत्नाने समिती गठित करण्यात आली.राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे ८-९ बैठका झाल्या असून, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने जानेवारी २०१६ मध्ये अंतरिम रुपये ९०० देण्याचा निर्णय घेण्यात आला़ समितीच्या बैठकांमध्ये पगारवाढ व फरकामध्ये निश्चित निर्णय होत नसल्याने खा़ पवार जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा,असा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता़ खा. पवार यांनी सोमवारी पुणे येथे, तर मंगळवारी मुंबई येथे सुमारे ७-८ तास साखर संघ, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधून निर्णय दिला आहे़ भोसले म्हणाले, कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़ साखर कामगार समाधानी आहेत़ हा निर्णय होण्यात राज्य शासन, साखर संघाचेही सकारात्मक सहकार्य मिळाले आहे़ (वार्ताहर)शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत शंकर भोसले म्हणाले, अनेक साखर कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच साखर कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़