शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

साखर कामगारांचा पगारवाढीने जल्लोष

By admin | Updated: June 25, 2016 01:11 IST

१५ टक्के पगारवाढ : राजारामबापू कारखान्यावर आनंदोत्सव

इस्लामपूर : राज्यातील साखर कामगारांच्या पगारात १५ टक्के वाढ व १२ महिन्यांचा फरक देण्याच्या निर्णयाने राज्यातील साखर कामगारांमध्ये ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी त्रिपक्षीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष तानाजी खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजारामबापू साखर कारखान्यातील कामगारांनी साखर वाटून जल्लोष साजरा केला़ ३१ मार्च २०१३ ला त्रिपक्षीय समितीची मुदत संपली होती़ मात्र नवी समिती गठित करण्यास बराच विलंब लागला होता़ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पुणे, कार्याध्यक्ष अविनाश काका आपटे, अहमदनगर, राऊ पाटील, रावसाहेब भोसले, कोल्हापूर, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, सोलापूर, युवराज ननवरे, इंदापूर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला़ अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री व साखर उद्योगाचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रयत्नाने समिती गठित करण्यात आली.राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे ८-९ बैठका झाल्या असून, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने जानेवारी २०१६ मध्ये अंतरिम रुपये ९०० देण्याचा निर्णय घेण्यात आला़ समितीच्या बैठकांमध्ये पगारवाढ व फरकामध्ये निश्चित निर्णय होत नसल्याने खा़ पवार जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा,असा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता़ खा. पवार यांनी सोमवारी पुणे येथे, तर मंगळवारी मुंबई येथे सुमारे ७-८ तास साखर संघ, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधून निर्णय दिला आहे़ भोसले म्हणाले, कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़ साखर कामगार समाधानी आहेत़ हा निर्णय होण्यात राज्य शासन, साखर संघाचेही सकारात्मक सहकार्य मिळाले आहे़ (वार्ताहर)शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत शंकर भोसले म्हणाले, अनेक साखर कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच साखर कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़