शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

साखर कामगारांचा पगारवाढीने जल्लोष

By admin | Updated: June 25, 2016 01:11 IST

१५ टक्के पगारवाढ : राजारामबापू कारखान्यावर आनंदोत्सव

इस्लामपूर : राज्यातील साखर कामगारांच्या पगारात १५ टक्के वाढ व १२ महिन्यांचा फरक देण्याच्या निर्णयाने राज्यातील साखर कामगारांमध्ये ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी त्रिपक्षीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष तानाजी खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजारामबापू साखर कारखान्यातील कामगारांनी साखर वाटून जल्लोष साजरा केला़ ३१ मार्च २०१३ ला त्रिपक्षीय समितीची मुदत संपली होती़ मात्र नवी समिती गठित करण्यास बराच विलंब लागला होता़ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पुणे, कार्याध्यक्ष अविनाश काका आपटे, अहमदनगर, राऊ पाटील, रावसाहेब भोसले, कोल्हापूर, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, सोलापूर, युवराज ननवरे, इंदापूर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला़ अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री व साखर उद्योगाचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रयत्नाने समिती गठित करण्यात आली.राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे ८-९ बैठका झाल्या असून, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने जानेवारी २०१६ मध्ये अंतरिम रुपये ९०० देण्याचा निर्णय घेण्यात आला़ समितीच्या बैठकांमध्ये पगारवाढ व फरकामध्ये निश्चित निर्णय होत नसल्याने खा़ पवार जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा,असा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता़ खा. पवार यांनी सोमवारी पुणे येथे, तर मंगळवारी मुंबई येथे सुमारे ७-८ तास साखर संघ, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधून निर्णय दिला आहे़ भोसले म्हणाले, कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़ साखर कामगार समाधानी आहेत़ हा निर्णय होण्यात राज्य शासन, साखर संघाचेही सकारात्मक सहकार्य मिळाले आहे़ (वार्ताहर)शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत शंकर भोसले म्हणाले, अनेक साखर कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच साखर कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़