शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

साखर कामगारांचा पगारवाढीने जल्लोष

By admin | Updated: June 25, 2016 01:11 IST

१५ टक्के पगारवाढ : राजारामबापू कारखान्यावर आनंदोत्सव

इस्लामपूर : राज्यातील साखर कामगारांच्या पगारात १५ टक्के वाढ व १२ महिन्यांचा फरक देण्याच्या निर्णयाने राज्यातील साखर कामगारांमध्ये ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी त्रिपक्षीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष तानाजी खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. राजारामबापू साखर कारखान्यातील कामगारांनी साखर वाटून जल्लोष साजरा केला़ ३१ मार्च २०१३ ला त्रिपक्षीय समितीची मुदत संपली होती़ मात्र नवी समिती गठित करण्यास बराच विलंब लागला होता़ महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, पुणे, कार्याध्यक्ष अविनाश काका आपटे, अहमदनगर, राऊ पाटील, रावसाहेब भोसले, कोल्हापूर, सुरेश मोहिते, नितीन बेनकर, सोलापूर, युवराज ननवरे, इंदापूर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला़ अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री व साखर उद्योगाचे मार्गदर्शक शरद पवार यांच्या प्रयत्नाने समिती गठित करण्यात आली.राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे येथे ८-९ बैठका झाल्या असून, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने जानेवारी २०१६ मध्ये अंतरिम रुपये ९०० देण्याचा निर्णय घेण्यात आला़ समितीच्या बैठकांमध्ये पगारवाढ व फरकामध्ये निश्चित निर्णय होत नसल्याने खा़ पवार जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा,असा समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता़ खा. पवार यांनी सोमवारी पुणे येथे, तर मंगळवारी मुंबई येथे सुमारे ७-८ तास साखर संघ, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही बाजूमध्ये समन्वय साधून निर्णय दिला आहे़ भोसले म्हणाले, कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़ साखर कामगार समाधानी आहेत़ हा निर्णय होण्यात राज्य शासन, साखर संघाचेही सकारात्मक सहकार्य मिळाले आहे़ (वार्ताहर)शरद पवार यांच्या निर्णयाचे स्वागत शंकर भोसले म्हणाले, अनेक साखर कारखान्यांपुढे उभा असणारे आर्थिक संकट तसेच साखर कामगार व साखर कारखानदारांच्या भूमिका यातून मार्ग निघणे अवघड होते़ मात्र माजी खा. शरद पवार यांनी वेळ देऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय दिला़