शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तलाव ३० टक्केच भरलेले...

By admin | Updated: August 7, 2014 00:20 IST

पावसाळ्यातील स्थिती : कडेगाव, मिरज तालुक्यातील तलावांमध्ये ६० टक्के पाणीसाठा

अशोक डोंबाळे - सांगली .. ढगांची दाटी आणि संततधार बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्याला दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील तलावांतील पाणी साठ्याची स्थिती अजूनही समाधानकारक नाही. काही ठिकाणचा पाणीसाठा समाधानकारक, तर काही ठिकाणचा चिंताजनक दिसत आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली असली तरी, एकूण तलावांमधील पाणी साठ्याची सरासरी तितकी समाधानकारक नाही. संपूर्ण जिल्ह्यात सध्या ३0 टक्केच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे वर्षभराचा विचार केला, तर आणखी पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्ये ९ हजार ३९८.७५ दशलक्ष घनफूट पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दोन हजार ८५३.५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असून, मिरज, कडेगाव तालुक्यातील तलावांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुक्यातील पाचही तलाव शंभर टक्के भरल्यामुळे तेथील गावांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. जत, आटपाडी, तासगाव तालुक्यातील तलावांमध्ये आजही २० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे जोराचा पाऊस झाला नाही, तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मान्सून गायब झाला असे म्हणताच जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. थांबलेल्या खरीप पेरण्यांनीही पुन्हा गती घेऊन ७० टक्क्यांपर्यंत कशीबशी आकडेवारी पोहोचली. मान्सूनची आकडेवारी आणि जिल्ह्यातील तलावातील पाणीसाठा पाहिल्यास दुष्काळी भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे ८३ पाझर तलाव असून, त्यापैकी सर्वाधिक २८ जत तालुक्यात आहेत. जत तालुक्यातील तलावांची पाणी साठ्याची क्षमता ३ हजार ७१४.०५ दशलक्ष घनफूट आहे. सध्या या तलावांमध्ये ३९९.४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. तलावातील पाणीसाठा केवळ ११ टक्के असून, तो दोन महिने पुरेल एवढाच आहे. सध्या कृष्णा नदीतून पाणी वाहून जात आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील तलाव भरण्याची गरज आहे. अन्यथा डिसेंबर, जानेवारीत दुष्काळी तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.शिराळा तालुक्यातील वाकुर्डे, अंत्री, टाकवे, शिवणी हे सर्व तलाव शंभर टक्के भरले आहेत. वाळवा तालुक्यातील कार्वे, रेठरेधरण तलाव ५६ टक्के भरले आहेत.