कुंडल ग्रामपंचायतीने लोकसहभागातून व सामूहिक पुढाकारातून विविध उपक्रम राबविले. परीक्षेस सामोरे जात असताना ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभागातून आणि वैयक्तिक व सामूहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या बाबीअंतर्गत सर्व कामामध्ये विशेष काम केल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आला आहे, तसेच पुढील तपासणीसाठी गाव पात्र ठरले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत २०० गुणास अनुसरून, शासन निर्णयाप्रमाणे पुढील तपासणीपूर्वी पूर्तता करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे, तसेच नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केलेले आहे.
कुंडल ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. (बापू) लाड यांच्या स्वप्नातील गाव होण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग घेऊन ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विधानपरिषद सदस्य आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दुध संघाचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड पंचायत समिती सदस्य अरुण पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सरपंच प्रमिला पुजारी उपसरपंच माणिक पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रशासकीय यंत्रणा पुढील तपासणीसाठी पूर्तता करून स्पर्धेसाठी उतरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.