शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प एक तप कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला ...

अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला वरदान ठरणारा आणि कृष्णाकाठ वाचविण्याची क्षमता असणाऱ्या कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प योजनेवर प्रकाशझोत टाकणारी वृतमालिका आजपासून...

कृष्णा- माणगंगा जोडप्रकल्प - १

अविनाश बाड

आटपाडी

: आटपाडी तालुक्यासह माणगंगा नदीच्या खोऱ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत क्वचित पाऊस पडतो. अलीकडे कृष्णा खोऱ्यात याच काळात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी असते. अनेकदा महापूर येतो आणि कृष्णाकाठच्या परिसराचे होत्याचे नव्हते होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाईजवळ धोमधरण आहे. तिथून माणगंगा नदीपर्यंत बोगदा काढून पाणी सोडण्याची योजना तांत्रिक दृष्ट्या मंजूर होऊन १२ वर्षे झाली, तरी ती प्रत्यक्षात आवतरली नाही. ही योजना झाली तर महापूर आणि दुष्काळ या संकटांवर एकच रामबाण उपाय निघणार आहे.

वाई (जि. सातारा) येथेही पुरामुळे हानी होते. यामुळे तिथल्या प्रकल्पाच्या डाव्या बाजूला कालवा काढून कृष्णामाई दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव या योजनेद्वारे आहे. तिथून ७६ कि.मी. अंतरावर नैसर्गिक उताराने आवश्यक तिथे बोगदा काढून पिंगळी (ता. माण जि. सातारा) येथे पाणी सोडायचे. पिंगळी नदीतून नैसर्गिक उताराने माणगंगा नदीत कृष्णामाई अवतरेल. माणगंगा नदी पुढे भीमा नदीला सरकोली (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे मिळते. पुढे भीमा नदीचा

कुरवरपूरम (कर्नाटक) येथे कृष्णा नदीचा श्रीसंगम होतो.

कृष्णा नदीला मिळून हे पाणी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनाच मिळते.

पाणी विभागून गेल्याने महापुराचे संकट टळते.

२००६ ते २००८ या कालावधीत उपग्रहाच्या मदतीने घेतलेली छायाचित्रे, टोपोशिट्स आणि प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन हा प्रकल्प तयार केला. हा प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून मंजूर केला. दि. २६ मार्च २००९ पासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लालफितीत अडकून पडला आहे. त्यावेळी या प्रकल्पाचा ५७० कोटी एवढा खर्च अपेक्षित होता. आता त्यासाठी २१६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोट

दुष्काळी भागातील कोरड्या नद्यांचा वापर कालवा म्हणून करावा. हे पाणी पुढे कर्नाटकमध्ये कृष्णा नदीलाच जाऊन मिळते. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन होऊन महापूर आणि दुष्काळावर मात करता येईल.

- दिनकर पवार, निवृत अभियंता, पाटबंधारे विभाग.

चौकट

कृष्णाकाठच्या पुत्राने मांडलेली योजना!

२००३ मध्ये आटपाडी परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाचे अभियंता

दिनकर पवार येथे होते. तलावात गाळ, पाणी राखण्यासाठी पोलीस संरक्षण आणि पाण्याविना लोकांचे होणारे हाल त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांची वडूज (जि. सातारा) येथे बदली झाली. तिथेही तीच अवस्था. त्यांचे मूळगाव पुणदी (ता. पलूस) २००५ मध्ये कृष्णेला गावी महापूर आला; मग त्यांचा अभ्यास सुरू झाला आणि या योजनेचा जन्म झाला.