शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प एक तप कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला ...

अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला वरदान ठरणारा आणि कृष्णाकाठ वाचविण्याची क्षमता असणाऱ्या कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प योजनेवर प्रकाशझोत टाकणारी वृतमालिका आजपासून...

कृष्णा- माणगंगा जोडप्रकल्प - १

अविनाश बाड

आटपाडी

: आटपाडी तालुक्यासह माणगंगा नदीच्या खोऱ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत क्वचित पाऊस पडतो. अलीकडे कृष्णा खोऱ्यात याच काळात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी असते. अनेकदा महापूर येतो आणि कृष्णाकाठच्या परिसराचे होत्याचे नव्हते होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाईजवळ धोमधरण आहे. तिथून माणगंगा नदीपर्यंत बोगदा काढून पाणी सोडण्याची योजना तांत्रिक दृष्ट्या मंजूर होऊन १२ वर्षे झाली, तरी ती प्रत्यक्षात आवतरली नाही. ही योजना झाली तर महापूर आणि दुष्काळ या संकटांवर एकच रामबाण उपाय निघणार आहे.

वाई (जि. सातारा) येथेही पुरामुळे हानी होते. यामुळे तिथल्या प्रकल्पाच्या डाव्या बाजूला कालवा काढून कृष्णामाई दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव या योजनेद्वारे आहे. तिथून ७६ कि.मी. अंतरावर नैसर्गिक उताराने आवश्यक तिथे बोगदा काढून पिंगळी (ता. माण जि. सातारा) येथे पाणी सोडायचे. पिंगळी नदीतून नैसर्गिक उताराने माणगंगा नदीत कृष्णामाई अवतरेल. माणगंगा नदी पुढे भीमा नदीला सरकोली (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे मिळते. पुढे भीमा नदीचा

कुरवरपूरम (कर्नाटक) येथे कृष्णा नदीचा श्रीसंगम होतो.

कृष्णा नदीला मिळून हे पाणी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनाच मिळते.

पाणी विभागून गेल्याने महापुराचे संकट टळते.

२००६ ते २००८ या कालावधीत उपग्रहाच्या मदतीने घेतलेली छायाचित्रे, टोपोशिट्स आणि प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन हा प्रकल्प तयार केला. हा प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून मंजूर केला. दि. २६ मार्च २००९ पासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लालफितीत अडकून पडला आहे. त्यावेळी या प्रकल्पाचा ५७० कोटी एवढा खर्च अपेक्षित होता. आता त्यासाठी २१६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोट

दुष्काळी भागातील कोरड्या नद्यांचा वापर कालवा म्हणून करावा. हे पाणी पुढे कर्नाटकमध्ये कृष्णा नदीलाच जाऊन मिळते. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन होऊन महापूर आणि दुष्काळावर मात करता येईल.

- दिनकर पवार, निवृत अभियंता, पाटबंधारे विभाग.

चौकट

कृष्णाकाठच्या पुत्राने मांडलेली योजना!

२००३ मध्ये आटपाडी परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाचे अभियंता

दिनकर पवार येथे होते. तलावात गाळ, पाणी राखण्यासाठी पोलीस संरक्षण आणि पाण्याविना लोकांचे होणारे हाल त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांची वडूज (जि. सातारा) येथे बदली झाली. तिथेही तीच अवस्था. त्यांचे मूळगाव पुणदी (ता. पलूस) २००५ मध्ये कृष्णेला गावी महापूर आला; मग त्यांचा अभ्यास सुरू झाला आणि या योजनेचा जन्म झाला.