नाल्यांचे रुंदीकरण गरजेचे
सांगली : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर नालेसफाईची आठवण होते. मात्र अनेक ठिकाणी नाले अरुंद झाल्याने पावसाचे पाणी साचून राहत आहे. यामुळे नाल्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
------------------------
दुग्ध व्यवसाय अडचणीत
सांगली : जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या पुशखाद्याच्या दरात वाढ झाली आहे; पण शेतकऱ्यांकडून दूध संघाला विक्री होणाऱ्या दुधाच्या दरात वाढ झाली नाही. यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत येत आहे. दुधाला चांगला दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
----------------
गुणवत्तापूर्ण शिक्षण हवे
सांगली : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू झाली आहे. यामुळे मुलांचा शैक्षणिक विकास किती झाला, याची तुलना करणारी यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. यामुळे ऑनलाईन शिक्षणात गुणवत्ता तपासून त्यात सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.
---------------
शेतकऱ्यांची कसरत
मिरज : पावसाळा सुरू झाल्याने पाणंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना कसरत करावी लागत आहे. याचा विचार करून पाणंद रस्ते दुरुस्तीबाबत आगामी काळात मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------------