शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेवर होतेय पुलांची माळ, नियोजनशून्य कारभाराचा गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. आता शहराबाहेरून बायपास रस्ता व नवीन पुलाचा प्रस्ताव समोर आला आहे. हरिपूरजवळ आणखी एका पुलाचे काम पूर्ण होत आले. सांगली ते हरिपूर या तीन ते चार किलोमीटर अंतरातच नदीवर चार पूल होणार आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारातून नदीवर पुलांची माळच उभारली जात आहे.

पूर्वी सांगली शहरात प्रवेश करणाऱ्यासाठी कृष्णा नदीवर १९२९ साली पूल बांधण्यात आला. त्याला ९० वर्षे पूर्ण झाली. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहराबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात आला. सांगलीवाडी जकात नाक्यापासून माधवनगर रस्त्यापर्यंत हा नवीन बायपास झाला. तेथेही नव्याने पूल उभारला गेला. हा बायपास रस्ताही शेवटी शहरात येऊनच थांबला. तो पुढे मिरजेपर्यंत गेलाच नाही. त्यात आयर्विन पुलाची वयोमर्यादा संपल्याने त्याला पर्यायी पुलाची चर्चा सुरू झाली. त्यात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलाला शासनानेही मंजुरी देत अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केली. या नव्या पुलाची निविदा काढून वर्कऑडरही देण्यात आली, पण राजकीय वाद आणि नागरिकांच्या विरोधामुळे पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही.

त्याचवेळी हरिपूर गावाजवळ कृष्णा नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू झाले. आता ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलालाही विरोध झाला, पण विरोधाला न जुमानता पुलाचे काम सुरूच ठेवण्यात आले. आता पुन्हा सांगलीवाडी ते हरिपूर लिंगायत स्मशानभूमी ते कोल्हापूर रोड या १०० फुटी डीपी रस्त्याच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भविष्यात रस्त्याचे काम सुरू झाल्यास पुन्हा कृष्णा नदीवर आणखी एक पूल उभा करावा लागणार आहे. सांगली ते हरिपूर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरात सध्या तीन पूल अस्तित्वात आहेत. त्यात आणखी एका पुलाची भर पडेल. वास्तविक इतक्या पुलांची गरज सांगलीला आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता होती. यातून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्यतेचे दर्शन होते.

चौकट

महापुराची धास्ती

कृष्णा नदीला गेल्या पंधरा वर्षांत तीनदा महापुराशी सामना करावा लागला. त्यात २०१९ मध्ये झालेला महापूर तर प्रलयंकारीच होता. निम्म्याहून अधिक सांगली पाण्याखाली होती. विविध मार्गांनी नदीच्या प्रवाहात अडथळे आणल्याने पाण्याचा फुगवटा होऊन पुराचे पाणी शहरात शिरल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यात नदीवरील पुलांची समावेश होतो. हरिपूरला २००५ च्या पुरात पाणी शिरले नव्हते, पण २०१९ ला मात्र पाणी गल्लीबोळात शिरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भविष्यात महापुराची स्थिती निर्माण झाल्यास चार पुलांमुळे आणखी शहर पाण्याखाली जाण्याची धास्ती आहे.