शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृष्णेवर होतेय पुलांची माळ, नियोजनशून्य कारभाराचा गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरालगतच्या कृष्णा नदीवर आधीच दोन पूल आहेत. त्यातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचे काम मंजूर आहे. आता शहराबाहेरून बायपास रस्ता व नवीन पुलाचा प्रस्ताव समोर आला आहे. हरिपूरजवळ आणखी एका पुलाचे काम पूर्ण होत आले. सांगली ते हरिपूर या तीन ते चार किलोमीटर अंतरातच नदीवर चार पूल होणार आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारातून नदीवर पुलांची माळच उभारली जात आहे.

पूर्वी सांगली शहरात प्रवेश करणाऱ्यासाठी कृष्णा नदीवर १९२९ साली पूल बांधण्यात आला. त्याला ९० वर्षे पूर्ण झाली. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहराबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात आला. सांगलीवाडी जकात नाक्यापासून माधवनगर रस्त्यापर्यंत हा नवीन बायपास झाला. तेथेही नव्याने पूल उभारला गेला. हा बायपास रस्ताही शेवटी शहरात येऊनच थांबला. तो पुढे मिरजेपर्यंत गेलाच नाही. त्यात आयर्विन पुलाची वयोमर्यादा संपल्याने त्याला पर्यायी पुलाची चर्चा सुरू झाली. त्यात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलाला शासनानेही मंजुरी देत अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद केली. या नव्या पुलाची निविदा काढून वर्कऑडरही देण्यात आली, पण राजकीय वाद आणि नागरिकांच्या विरोधामुळे पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही.

त्याचवेळी हरिपूर गावाजवळ कृष्णा नदीवर नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू झाले. आता ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलालाही विरोध झाला, पण विरोधाला न जुमानता पुलाचे काम सुरूच ठेवण्यात आले. आता पुन्हा सांगलीवाडी ते हरिपूर लिंगायत स्मशानभूमी ते कोल्हापूर रोड या १०० फुटी डीपी रस्त्याच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भविष्यात रस्त्याचे काम सुरू झाल्यास पुन्हा कृष्णा नदीवर आणखी एक पूल उभा करावा लागणार आहे. सांगली ते हरिपूर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरात सध्या तीन पूल अस्तित्वात आहेत. त्यात आणखी एका पुलाची भर पडेल. वास्तविक इतक्या पुलांची गरज सांगलीला आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता होती. यातून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्यतेचे दर्शन होते.

चौकट

महापुराची धास्ती

कृष्णा नदीला गेल्या पंधरा वर्षांत तीनदा महापुराशी सामना करावा लागला. त्यात २०१९ मध्ये झालेला महापूर तर प्रलयंकारीच होता. निम्म्याहून अधिक सांगली पाण्याखाली होती. विविध मार्गांनी नदीच्या प्रवाहात अडथळे आणल्याने पाण्याचा फुगवटा होऊन पुराचे पाणी शहरात शिरल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यात नदीवरील पुलांची समावेश होतो. हरिपूरला २००५ च्या पुरात पाणी शिरले नव्हते, पण २०१९ ला मात्र पाणी गल्लीबोळात शिरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भविष्यात महापुराची स्थिती निर्माण झाल्यास चार पुलांमुळे आणखी शहर पाण्याखाली जाण्याची धास्ती आहे.