शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोकरूड ग्रामीण रुग्णालय ‘कोमात’

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

कोट्यवधीचा निधी वाया : सर्पदंश, श्वानदंशावर लस उपलब्ध नाही

बाबासाहेब परीट - बिळाशी कोकरूड (ता. शिराळा) येथील ग्रामीण रुग्णालय सोयी-सुविधांविना व डॉक्टर नसल्याने शेवटचे आचके देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य माणसांमध्ये तीव्र असंतोष आहे. गेले काही दिवस पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोकरूडचे ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर, तर रुग्ण मृत्युशय्येवर आहेत.कोकरूड येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळूनही प्राथमिक आरोग्य केंद्र बिळाशी येथे हलविण्यात येणार होते. परंतु सध्या कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. परंतु गेले अनेक दिवस डॉक्टरविना रुग्णांची हेळसांड सुरू आहे. गेल्या महिन्याभरात बिळाशी येथील महादेव हंडे, बबनराव धस, वैशाली साळुंखे, मानसिंग साळुंखे या व्यक्तींना सर्पदंश झाला. कोकरूड आरोग्य केंद्रात व रुग्णालयात सर्पदंश लस उपलब्ध नसल्याने त्यांना कोल्हापूर, सांगलीला हलवावे लागले. सध्या येथील नागरिकांना १०८ रुग्णवाहिकेचा आधार वाटत आहे.सुरुवातीपासूनच येथील डॉक्टरांचा पदभार शिराळा किंवा सागावकडे दिला आहे. त्यामुळे २४ तास आवश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून पूर्वी तरुणांनी डॉक्टर उपलब्ध हेण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु सध्या एनआरएचएम डॉक्टरांवरच हे आरोग्य केंद्र चालू आहे. ज्यांच्याकडे चार्ज आहे, ते डॉक्टर इकडे फिरकत नसल्याचीही चर्चा नागरिकांतून सुरू आहे.ग्रामीण रुग्णालयासाठी पाच डॉक्टर पदे मंजूर असून, त्यामध्ये एक एम. डी. किंवा एम. एस. दर्जाचा, एक स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ व एनआरएचएमचे आयुर्वेद व होमिओपॅथिक असे सात डॉक्टर्स, आठ नर्स, दोन परिचर, पाच शिपाई, तीन क्लार्क, दोन वाहनचालक असा मंजूर कर्मचारी वर्ग आहे. परंतु येथे एनआरएचएमच्या डॉक्टरांशिवाय अन्य डॉक्टर उपलब्ध नसतात. तातडीसाठी १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. भोंगळ कारभाराने नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासन हलविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेऊन लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी नागरिकांची मागणी आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.खर्च मोठा : पण रुग्णांच्या गैरसोयीचे काय?सध्या ‘आॅक्टोबर हिट’ असल्याने या दिवसात सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक असते. शिराळा तालुक्यातील लोक शेतीवरच उपजीविका करीत असल्याने सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. परंतु कोकरूड, चरण, मणदूर इथे सर्पदंश व श्वानदंशाच्या लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य रामभरोसे आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पूर्णवेळ डॉक्टर व सर्पदंशाची लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात एकही गंभीर शस्त्रक्रिया झालेली नाही व महिलांना प्रसुतीसाठीही इतरत्र पाठवले जाते. केवळ कोट्यवधी रुपये खर्ची पडतात; पण नागरिकांना त्याचा फायदा होत नसेल तर हा खर्च व्यर्थ आहे. कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला. धनगरपाडा येथून आलेल्या ८५ वर्षाच्या वृध्देला रूग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचारांशिवाय परत जावे लागले.