शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर, आटपाडीत पेटणार ‘टेंभू’चे पाणी

By admin | Updated: October 21, 2015 23:17 IST

राजकीय वातावरण गढूळ : संघर्ष सोडून सामूहिक प्रयत्नांची गरज

दिलीप मोहिते - विटा--खानापूर मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ‘टेंभू दिवास्वप्न’च्या वक्तव्यावरून आमदार अनिल बाबर यांनी सदाभाऊंना हैराण केले होते. परंतु, आता आ. बाबर यांच्या एका विधानाचा धागा पकडून सदाभाऊंचे पुत्र व विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आ. बाबर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच दुसरीकडे टेंभू योजना कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी नियोजनातील त्रुटींचा झेंडा खांद्यावर घेऊन तालुका ढवळून काढला आहे. त्यामुळे आता ‘टेंभू’चे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय पटलावर ‘टेंभू’चे पाणी गढूळ झाल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. खानापूर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक निवडणुका ‘टेंभू’च्या मुद्द्यावर गाजल्या व गाजविल्या गेल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व स्टार प्रचारकांनी ‘टेंभू’चे पाणी अक्षरश: दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचविलेही; मात्र ते कृत्रिमरित्याच! त्यामुळे बांधापर्यंत आलेले पाणी आता शेतात येणार, या आशेने दुष्काळग्रस्त मतदारांनी खानापूर-आटपाडी तालुक्यातील प्रतिनिधीत्व मुंबईत पाठविले. परंतु, तेथे ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी काय प्रयत्न झाले, हा खरा प्रश्न आजही दुष्काळग्रस्तांना नेहमीच सतावत आहे.गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी टेंभू म्हणजे दिवास्वप्न असल्याच्या तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वक्तव्याने संपूर्ण मतदार संघात खळबळ उडाली. त्याचे राजकीय भांडवल विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केले. त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे होते, हे सांगण्यासाठी पाटील यांची दमछाक झाली. आता विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात ‘टेंभू’च्या पाण्यात तालुक्याला बुडवून काढण्याची सुपारी घेतली नसल्याचे विधान केले. त्यामुळे आ. बाबर यांच्यावर माजी आमदार पाटील यांचे पुत्र नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यमान आमदारांचीही धावपळ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे. राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. राजकीय संघर्ष : आरोप-प्रत्यारोपाने करमणूक‘टेंभू’च्या योजनेवरून होत असलेल्या वार-पलटवारांमुळे दुष्काळग्रस्तांची करमणूक होत आहे. त्यामुळेच आता खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांत टेंभू योजनेचे पाणी पोहोचण्यापूर्वीच राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय संघर्ष, श्रेयवाद अथवा योजनेचे राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा दुष्काळग्रस्त व्यक्त करीत आहेत. या योजनेवरुन पुढील राजकारण काय दिशा घेणार, याकडे लक्ष लागले आहे. बाबासाहेब मुळीक यांनी रान उठविलेखानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे. याची आता दुष्काळी भागात चर्चा सुरु झाली आहे.