शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

पतंगरावांच्या घोषणेने दादा गटात खळबळ

By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST

समीकरणे बदलणार : लोकसभेच्या दावेदारांना लागली चिंता

सांगली : विधानसभेची शेवटची निवडणूक लढविण्याची घोषणा करून पतंगरावांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने, जिल्ह्याच्या राजकीय वतुर्ळात तसेच वसंतदादा गटात खळबळ माजली आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह दादा घराण्यातील अन्य वारसदार व समर्थकांमध्ये दोन दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. पतंगरावांचे पुढचे पाऊल काय असेल, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात अभेद्य असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला यंदा ढासळला. वसंतदादांचे नातू असलेले प्रतीक पाटील यांचा मोठ्या मतांनी पराभव झाल्याने, अजूनही या धक्क्यातून दादाप्रेमी सावरलेले नाहीत. त्यातच पतंगरावांच्या लोकसभा निवडणुकीच्या संकेतांमुळे सांगलीतील दादा गटात खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये कदम गट व दादा गट अस्तित्वात असल्याचे नेहमीच बोलले जाते. पतंगरावांनी नेहमीच हा मुद्दा खोडून काढला आहे. तरीही या चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असतात. सांगली लोकसभेच्या २00९ च्या निवडणुकीतही कदम व दादा गटातील संघर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच जिल्ह्याने पाहिला होता. लोकसभेसाठी विश्वजित कदम यांनीही उमेदवारी मागितली होती. प्रतीक व विश्वजित यांच्यात उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पक्षीय पातळीवर आला होता. त्यावेळीही दोन गटांत काँग्रेस विभागली गेली होती. अखेर तिकीट प्रतीक पाटील यांना मिळाल्यानंतर विश्वजित कदम यांनी पक्षीय प्रचारात सहभाग घेतला. मात्र तोपर्यंत अप्रत्यक्षपणे दोन्ही नेते व त्यांच्या समर्थकांकडून परस्परांवर टीका होत होती. महापालिका निवडणुकीपूर्वी दादा व कदम गटात समेट झाला. मदन पाटील यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे दोन्ही गटांचे सूर जुळले. आजही कदम व दादा गटातील कार्यकर्ते एकत्रित दिसत आहेत. अशा परिस्थितीत अचानक पतंगरावांच्या घोषणेने शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. पतंगराव सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले, तर वसंतदादा घराण्याच्या दावेदारीचे काय होणार?, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे. गत लोकसभेचा अपवाद वगळला, तर वसंतदादांच्या घराण्याने लोकसभेला कधीही पराभव पाहिला नव्हता. यंदा या परंपरेला धक्का बसला होता. त्यातच पतंगरावांच्या घोषणेवरून वसंतदादा गटात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत दादा घराण्याअंतर्गतच गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे. यात आता पतंगरावांच्या चर्चेची भर पडली आहे. (प्रतिनिधी) पुण्यापेक्षा सांगलीच सोयीची..!पतंगराव कदम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय भविष्यात जाहीर केलाच, तर त्यांना सांगलीच अधिक सोयीचा मतदारसंघ ठरेल, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. विश्वजित कदम यांचा पुणे मतदारसंघात मोठा पराभव झाल्याने त्याठिकाणी पुन्हा धोका पत्करण्याचा निर्णय त्यांच्याकडून होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत नाही. दोन्ही मतदारसंघांचा विचार सुरू झाला, तर त्यांच्या समर्थकांकडूनही सांगलीसाठीच आग्रह होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीला अजून पाच वर्षांचा कालावधी असला तरी, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय क्षेत्रातील समीकरणे पतंगरावांच्या या घोषणेमुळे बदलण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.