शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पतंगरावांच्या घोषणेने दादा गटात खळबळ

By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST

समीकरणे बदलणार : लोकसभेच्या दावेदारांना लागली चिंता

सांगली : विधानसभेची शेवटची निवडणूक लढविण्याची घोषणा करून पतंगरावांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने, जिल्ह्याच्या राजकीय वतुर्ळात तसेच वसंतदादा गटात खळबळ माजली आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह दादा घराण्यातील अन्य वारसदार व समर्थकांमध्ये दोन दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. पतंगरावांचे पुढचे पाऊल काय असेल, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात अभेद्य असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला यंदा ढासळला. वसंतदादांचे नातू असलेले प्रतीक पाटील यांचा मोठ्या मतांनी पराभव झाल्याने, अजूनही या धक्क्यातून दादाप्रेमी सावरलेले नाहीत. त्यातच पतंगरावांच्या लोकसभा निवडणुकीच्या संकेतांमुळे सांगलीतील दादा गटात खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये कदम गट व दादा गट अस्तित्वात असल्याचे नेहमीच बोलले जाते. पतंगरावांनी नेहमीच हा मुद्दा खोडून काढला आहे. तरीही या चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असतात. सांगली लोकसभेच्या २00९ च्या निवडणुकीतही कदम व दादा गटातील संघर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच जिल्ह्याने पाहिला होता. लोकसभेसाठी विश्वजित कदम यांनीही उमेदवारी मागितली होती. प्रतीक व विश्वजित यांच्यात उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पक्षीय पातळीवर आला होता. त्यावेळीही दोन गटांत काँग्रेस विभागली गेली होती. अखेर तिकीट प्रतीक पाटील यांना मिळाल्यानंतर विश्वजित कदम यांनी पक्षीय प्रचारात सहभाग घेतला. मात्र तोपर्यंत अप्रत्यक्षपणे दोन्ही नेते व त्यांच्या समर्थकांकडून परस्परांवर टीका होत होती. महापालिका निवडणुकीपूर्वी दादा व कदम गटात समेट झाला. मदन पाटील यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे दोन्ही गटांचे सूर जुळले. आजही कदम व दादा गटातील कार्यकर्ते एकत्रित दिसत आहेत. अशा परिस्थितीत अचानक पतंगरावांच्या घोषणेने शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. पतंगराव सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले, तर वसंतदादा घराण्याच्या दावेदारीचे काय होणार?, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे. गत लोकसभेचा अपवाद वगळला, तर वसंतदादांच्या घराण्याने लोकसभेला कधीही पराभव पाहिला नव्हता. यंदा या परंपरेला धक्का बसला होता. त्यातच पतंगरावांच्या घोषणेवरून वसंतदादा गटात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत दादा घराण्याअंतर्गतच गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे. यात आता पतंगरावांच्या चर्चेची भर पडली आहे. (प्रतिनिधी) पुण्यापेक्षा सांगलीच सोयीची..!पतंगराव कदम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय भविष्यात जाहीर केलाच, तर त्यांना सांगलीच अधिक सोयीचा मतदारसंघ ठरेल, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. विश्वजित कदम यांचा पुणे मतदारसंघात मोठा पराभव झाल्याने त्याठिकाणी पुन्हा धोका पत्करण्याचा निर्णय त्यांच्याकडून होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत नाही. दोन्ही मतदारसंघांचा विचार सुरू झाला, तर त्यांच्या समर्थकांकडूनही सांगलीसाठीच आग्रह होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीला अजून पाच वर्षांचा कालावधी असला तरी, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय क्षेत्रातील समीकरणे पतंगरावांच्या या घोषणेमुळे बदलण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.