शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

महापालिकेच्या ऑक्सिजन प्रकल्पाला कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : निविदेच्या नावाखाली महापालिकेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास विलंब होत असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी महापौरांकडे नाराजी ...

सांगली : निविदेच्या नावाखाली महापालिकेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास विलंब होत असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी महापौरांकडे नाराजी व्यक्त केली. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याला समज देऊन तातडीने प्रकल्प मार्गी लावावा, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार या प्रकल्पासह व्हेंटिलेटर्स खरेदीचाही निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या खरेदीस मान्यताही देण्यात आली, मात्र स्थायी समिती सभेत प्रशासनाकडून हा विषय येताना एका ठेकेदाराचे नाव घालण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीने कोटेशन पध्दतीने हे काम करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाकडून होत असलेली कामे कमी रकमेत व जलद होत असताना, महापालिका मात्र या कामासाठी जास्त पैसे का देत आहे, असा सवाल सदस्यांनी केला होता.

त्यानंतर ऑक्सिजन प्लांटसाठी मुदतीत एकच निविदा दाखल झाल्याने ५ दिवसांची मुदतवाढ दिली. या सर्व गोष्टीत जवळपास १८ ते २० दिवसांचा विलंब झाला आहे. कासवगतीने प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे रुग्णांचा ऑक्सिजनअभावी जीव जात असताना, महापालिका प्रशासन मात्र प्रकल्प उभारणीत चालढकलपणा करत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. सूर्यवंशी यांनी महापालिका प्रशासनामुळेच या कामास विलंब होत असल्याचे सांगितले आहे.

चौकट

नेमका गोंधळ कोणाचा?

काही अधिकाऱ्यांचा या कामात स्वार्थ होता. तो निविदा प्रक्रियेमुळे साधला गेला नसल्याने अधिकारी प्रकल्पास विलंब करीत असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. प्रशासनाने अद्याप याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे हा गोंधळ नेमका कोणाचा आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

चौकट

आलेली कंपनी परत गेली

ऑक्सिजन प्लांटसाठी १ कोटी १९ लाख, तर व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापेक्षा तीन लाख रुपये कमी दरात प्रकल्प उभारण्यासाठी एका शासनमान्य कंपनीने तयारी दाखविली होती. त्याबाबत लवकर निर्णय घेतला नाही. इतक्यात अन्यत्र काम मिळाल्याने या कंपनीने महापालिकेच्या निविदेत भागच घेतला नाही. आलेली कंपनी दुसरीकडे गेल्याने आता अन्य कंपन्यांचा शोध निविदेद्वारे महापालिकेस घ्यावा लागणार आहे.