शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

इस्लामपुरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूवरून जयंतराव संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : मेच्या अवघ्या १६ दिवसात शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येतील वाढ आणि वाढत्या मृत्यूवर काळजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : मेच्या अवघ्या १६ दिवसात शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येतील वाढ आणि वाढत्या मृत्यूवर काळजी व्यक्त करतानाच संतापलेल्या पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते, भरमसाट बिले करून लूट केली जाते, त्या रुग्णालयांबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आदेश त्यांनी दिले.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेतली. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने वस्तुस्थितीची तपासणी करून कडक पावले उचलायला हवीत. कोरोनाग्रस्त लहान मुलांसाठी छोटे कोविड सेंटर सुरू करावे लागेल. प्रशासनाने यासाठी तालुक्यातील लहान मुलांच्या डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा करावी. आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास अद्ययावत रुग्णवाहिका देण्यात येईल. या बैठकीत उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांची जयंत पाटील यांच्या संतापाचा सामना करताना भंबेरी उडाली.

गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा मांडला.

आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका व शववाहिकेची मागणी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे यांनी शहरातील काही रुग्णालयातील विदारक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली.

तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील, आष्ट्याचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, डॉ. अशोक शेंडे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, भगवान पाटील, सुभाष सूर्यवंशी, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, खंडेराव जाधव आदी उपस्थित होते.

चौकट

कोणत्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूची संख्या किती?

उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहाजी पाटील यांनी शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या किती आहे, त्यावर आपण काय कारवाई केली, असा प्रश्न केला. त्यावर उत्तरे देताना अधिकारी गोंधळून गेले.