शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

जत तालुक्यात कोविड सेंटर, म्हैसाळ पाण्यावरून श्रेयवाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

संख : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातील ३१ गावे हॉटस्पॉट बनली आहेत. रुग्णांच्या संख्येने बेड तोकडे ...

संख : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातील ३१ गावे हॉटस्पॉट बनली आहेत. रुग्णांच्या संख्येने बेड तोकडे पडत आहेत. कोरोना महामारीचे संकटाचा सामना करण्यासाठी राजकीय मतभेद विसरून लढा देण्याची गरज असताना तालुक्यातील राजकीय मंडळी कोविड सेंटर, म्हैसाळ पाणी श्रेयवादाच्या कामात गुंतलेले आहे. श्रेयवादाची खुमासदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. राजकीय लोकांच्या असंवेदनशीलतेबाबत ग्रामस्थांतून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना उपाययोजना, जनजागृती, प्रतिबंध, लसीकरण,उपचार यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज असताना उणेदुणे काढण्यात, श्रेय घेण्याची केवलवाणी धडपड सुरू आहे. शासकीय ७० बेडचे कोविड सेंटर समाजकल्याण वसतिगृहात उभारले गेले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमात श्रेय घेण्याच्या कारणावरून राजकीय पदाधिकारीत वादावादी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. अभिजित चौधरी यांनी हात जोडून शांत राहण्याचा विनंती केली. लोक जगले तरच तुम्हाला राजकारण करता येईल. याचे भान राजकारण्यांना कधी येणार ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

जत पूर्व भागात तालुक्यात ४० वर्षांनी म्हैसाळ योजनेचे बंदिस्त पाईपलाईने उमदीपर्यंत आले आहे. याचा उटगी, लकडेवाडी, सोन्याळ, गारळेवाडी, उमदी, शिंदे कोडगवस्ती येथील शेती, द्राक्ष, डाळिंब फळबागांना फायदा होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिघांत पाण्याचा श्रेयवाद रंगला आहे.

आमदार विक्रम सावंत यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. म्हैसाळ पाण्याचा श्रेय महाविकास आघाडीला दिले आहे. तर राष्ट्रवादीचे माजी शिक्षण सभापती तम्माणगौडा रवीपाटील, बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन, युवानेते सोमलिंग बोरमणी, युवा नेते संजय तेली यांनी आमदार माजी आमदार विलासराव जगताप, खासदार संजय खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नाने चाळीस वर्षांनंतर पाणी आल्याचा दावा केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य रमेश पाटील यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांना श्रेय दिले.

तालुक्यातील पूर्वभागामध्ये म्हैसाळ योजनेचे पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीने २०१६ मध्ये उमदी ते सांगली पायी दिंडी काढली होती. तत्कालीन अपक्ष आमदार मधुकर कांबळे यांनी १९९५ साली म्हैसाळ पाण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला होता. खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्यासाठी विस्तारित योजना मंजूर करून आणली. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकारामबाबा महाराज यांनी संख ते मुंबई मंत्रालय अशी पायी दिंडी काढली होती. पूर्वभागाला म्हैसाळचे पाण्यासाठी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे आ.विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केला होता. माजी जि.प.सदस्य कृष्णदेव गायकवाड याने पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. या सर्वांच्या संघर्षाची परिणती म्हणून उमदीपर्यंत पाणी आले आहे. ही समाधानाची बाब असताना पाण्याचे श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे. श्रेयाचे राजकारण सुरू आहे. विस्तारित योजनेतून, तुबची बबलेश्वर योजनेतून अन्य गावांना पाणी कसे मिळेल, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.