शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

कारागृह कवलापूरला होणार!

By admin | Updated: October 6, 2015 00:35 IST

जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव : २५ एकर जागेची मागणी

सचिन लाड --सांगली-जिल्हा मध्यवर्ती कारागृहासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कारागृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधण्यासाठी २५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना कारागृह प्रशासनाने सादर केला आहे. यावर पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-अडीच वर्षात सांगलीचे कारागृह कवलापूरला स्थलांतरित होईल.सांगली व आटपाडी याठिकाणी दोन कारागृहे आहेत. सांगलीच्या कारागृहात कच्च्या कैद्यांना ठेवले जाते. आटपाडीतील स्वतंत्रपूर येथे खुले कारागृह आहे. तिथे शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची सोय आहे. सांगलीचे कारागृह सव्वादोनशे क्षमतेचे आहे. गेल्या काही वर्षात कारागृह परिसरात लोकवस्ती वाढल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कारागृह स्थलांतर करण्याची चर्चा सुरू होती. यासाठी दोन महिन्यांपूर्वी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी कारागृह स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी त्यांनी चर्चा करून जागा देण्याची विनंती केली होती. जागेच्या विषयावर चर्चाही झाली. या चर्चेतून कवलापूर येथील नियोजित विमानतळाची जागा पडून असल्याने, ती घेण्याचे ठरले होते. त्यानुसार कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार यांनी महिन्यापूर्वी कवलापूर येथे जाऊन त्या जागेची पाहणी केली होती. ही विमानतळाची जागा औद्योगिक विकास महामंडळाच्याताब्यात आहे. आरटीओ कार्यालयानेही या जागेवर डोळा ठेवला आहे. दीडशे एकर जागा असल्याने ती कारागृह व आरटीओ कार्यालयास सहजपणे मिळू शकते. पण सध्या कारागृहास ही जागा तातडीने देण्याच्या हालचाली सुरु आहेत. सांगलीपासून नऊ किलोमीटर अंतरावर ही जागा आहे. त्यामुळे आरोपींना ने-आण करण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने हे अंतर अत्यंत कमी आहे. कारागृह प्रशासनाने २५ एकर जागा देण्याची मागणी केली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान, तसेच कारागृहाची इमारत बांधली जाणार आहे. कवलापूर आणि बुधगाव या दोन्ही गावांच्या मध्यभागी ही जागा आहे. कवलापूरच्या ग्रामस्थांनी येथे कारागृह बांधण्यास विरोध केला आहे. कवलापुरातील नियोजित विमानतळाच्या जागेतील २५ एकर जागा द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. जागा मिळाल्यानंतर पुढील कामाला उशीर लागणार नाही. येत्या दोन-अडीच वर्षात कारागृह व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान तयार होऊ शकते. - एम. एस. पवार, कारागृह अधीक्षक, सांगली.कारागृह तुडुंब जिल्हा कारागृहात दिवसेंदिवस कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्याच्या स्थितीला पावणेचारशे कैदी आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झाले असल्याने कारागृह अपुरे पडू लागले आहे. आजूबाजूला लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे कवलापूरच्या जागेत तातडीने कारागृह स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रथम जागा मंजूर झाल्यास पुढील कामाला गती येणार आहे. नव्या जागेत कैद्यांच्या वाढीव क्षमतेचे कारागृह बांधण्याचा विचार सुरु आहे.