शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जगतापांच्या टीकेने ऐक्य एक्स्प्रेसला धक्का

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी नेत्यांच्या अडचणी वाढल्या

अविनाश कोळी - सांगली --जिल्हा बँकेची ऐक्य एक्स्प्रेस रुळावर येण्यासाठी सज्ज होत असतानाच, भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या टीकेच्या माध्यमातून रुळावरच घाव घातला आहे. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही ऐक्य एक्स्प्रेस धावणार की रुळावरून घसरणार?, असा प्रश्न राजकीय नेत्यांना पडला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे लढविण्याबाबत राष्ट्रवादीने आवाहन केल्यानंतर काँग्रेस, भाजप नेत्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले होते. याबाबत अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर १२ किंवा १३ मार्च रोजी राष्ट्रवादीमार्फत बैठक घेऊन संयुक्त पॅनेलचा प्रस्ताव सर्व पक्षांना दिला जाणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी पक्षीय नेत्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विक्रमी अर्ज दाखल होत आहेत. अशातच आ. जगताप यांनी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. सहकाराची वाट त्यांनीच लावल्याची त्यांची टीका आता काँग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. ऐक्यासाठी अनुकूल असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आता भाजपबद्दल नाराजी दिसत आहे. एकत्रित येण्याच्या प्रक्रियेवेळी जगतापांची ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखीची ठरणार आहे. पतंगराव आणि मोहनरावांशिवाय काँग्रेसमध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे एकत्रित पॅनेलच्या जागावाटपावेळी भाजपच्या भूमिकेवरून अडचणी येण्याची चिन्हे आहेत. जगतापांच्या टीकेमुळे ऐक्याच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कदम बंधूंच्या उपस्थितीत बिनविरोधची चर्चा करू नये, असे मत जगतापांनी व्यक्त केले असले तरी, मोहनराव आणि पतंगरावांशिवाय बिनविरोधचे घोडे पळणारच नाही. त्यामुळे या टीकेच्या धक्क्याने ऐक्य एक्स्प्रेस रुळावरून घसरली तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही, प्रामाणिक लोकांना घेऊन पॅनेल केले जाणार असेल, तर भाजपही त्याला साथ देईल, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सर्वच पक्षांचा हिरवा कंदील बिनविरोधच्या शक्यतांनाही बळ देत होता. जगतापांनी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनाच लाल कंदील दाखविल्यामुळे या चर्चा पुन्हा फिसकटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसमधील अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जगताप यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हीच नाराजी जागावाटपाच्या चर्चेवेळीही पुन्हा डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांनी आजवर सहकाराला पूरक असेच कार्य केले आहे. संस्थात्मक उभारणीतून त्यांनी या गोष्टी सिद्ध केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या चौकशीत काँग्रेसच्याही बऱ्याच नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे कुणी स्वत:हून स्वत:ची चौकशी लावणार नाही. जगतापांची ही टीका व्यक्तिगत द्वेषातून झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. - पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस