शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

जगतापांच्या टीकेने ऐक्य एक्स्प्रेसला धक्का

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी नेत्यांच्या अडचणी वाढल्या

अविनाश कोळी - सांगली --जिल्हा बँकेची ऐक्य एक्स्प्रेस रुळावर येण्यासाठी सज्ज होत असतानाच, भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या टीकेच्या माध्यमातून रुळावरच घाव घातला आहे. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही ऐक्य एक्स्प्रेस धावणार की रुळावरून घसरणार?, असा प्रश्न राजकीय नेत्यांना पडला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे लढविण्याबाबत राष्ट्रवादीने आवाहन केल्यानंतर काँग्रेस, भाजप नेत्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले होते. याबाबत अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर १२ किंवा १३ मार्च रोजी राष्ट्रवादीमार्फत बैठक घेऊन संयुक्त पॅनेलचा प्रस्ताव सर्व पक्षांना दिला जाणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी पक्षीय नेत्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे विक्रमी अर्ज दाखल होत आहेत. अशातच आ. जगताप यांनी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. सहकाराची वाट त्यांनीच लावल्याची त्यांची टीका आता काँग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. ऐक्यासाठी अनुकूल असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आता भाजपबद्दल नाराजी दिसत आहे. एकत्रित येण्याच्या प्रक्रियेवेळी जगतापांची ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखीची ठरणार आहे. पतंगराव आणि मोहनरावांशिवाय काँग्रेसमध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे एकत्रित पॅनेलच्या जागावाटपावेळी भाजपच्या भूमिकेवरून अडचणी येण्याची चिन्हे आहेत. जगतापांच्या टीकेमुळे ऐक्याच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कदम बंधूंच्या उपस्थितीत बिनविरोधची चर्चा करू नये, असे मत जगतापांनी व्यक्त केले असले तरी, मोहनराव आणि पतंगरावांशिवाय बिनविरोधचे घोडे पळणारच नाही. त्यामुळे या टीकेच्या धक्क्याने ऐक्य एक्स्प्रेस रुळावरून घसरली तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही, प्रामाणिक लोकांना घेऊन पॅनेल केले जाणार असेल, तर भाजपही त्याला साथ देईल, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सर्वच पक्षांचा हिरवा कंदील बिनविरोधच्या शक्यतांनाही बळ देत होता. जगतापांनी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनाच लाल कंदील दाखविल्यामुळे या चर्चा पुन्हा फिसकटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसमधील अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जगताप यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हीच नाराजी जागावाटपाच्या चर्चेवेळीही पुन्हा डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांनी आजवर सहकाराला पूरक असेच कार्य केले आहे. संस्थात्मक उभारणीतून त्यांनी या गोष्टी सिद्ध केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या चौकशीत काँग्रेसच्याही बऱ्याच नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे कुणी स्वत:हून स्वत:ची चौकशी लावणार नाही. जगतापांची ही टीका व्यक्तिगत द्वेषातून झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. - पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस