शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

श्यामाप्रसाद मुखर्जींमुळेच पंजाब, बंगाल फाळणी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : देशाची फाळणी करताना मुस्लीमबहुल प्रदेशानुसार वाटणी करावी असे सूत्र मांडण्यात आले होते. पण, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : देशाची फाळणी करताना मुस्लीमबहुल प्रदेशानुसार वाटणी करावी असे सूत्र मांडण्यात आले होते. पण, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी प्रदेशातील संख्येनुसार विभागणीचा प्रस्ताव ठेवल्याने बंगाल व पंजाब भारतात राहिले, असे मत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे यांनी व्यक्त केले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बिरजे म्हणाले की, पश्चिम बंगाल हा भाग हिंदूबहुल असल्याने तिथल्या हिंदूंना फाळणीच्या प्रस्तावित सूत्रानुसार पाकिस्तानात जावे लागले असते. तेव्हा श्यामाप्रसाद यांनी प्रदेशानुसार विभागणी न करता प्रत्येक जिल्ह्याची हिंदू-मुस्लीमांची संख्या विचारात घेऊन फाळणी करावी, असा विचार मांडला. हेच सूत्र पंजाबलाही लागू करावे लागले. त्यांनी आग्रह धरल्याने आजचा बंगाल आणि पंजाब असे प्रांत भारतात राहिले. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या या महान कार्याचे सर्व भारतीयांनी कायम स्मरण ठेवले पाहिजे. यावेळी दीपक शिंदे, धीरज सूर्यवंशी, मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक संजय कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, मोहन वाटवे, गणेश कांबळे, प्रियानंद कांबळे, अविनाश मोहिते, अभयकुमार वाले, गौस पठाण, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.