शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST

विकास आराखडा अंतिम टप्प्यात : इस्लामपूर पालिकेतील नगररचना विभागाचा भोंगळ कारभार

अशोक पाटील - इस्लामपूर  --इस्लामपूरचा नियोजित विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. याचाच फायदा घेऊन सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने बिल्डर, धनदांडग्यांना बेकायदेशीर बांधकामासाठी अभय दिले आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांतील काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील हजारो बेकायदेशीरपणे बांधकामांवर हातोडा मारणे हे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान असणार आहे.इस्लामपुरात १९८० नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम परवाना मिळवणे मोठे आव्हान ठरत आहे. नगरपालिकेच्या नगररचना विभागात सर्वसामान्यांना गुंठेवारी नियमितीकरण आणि बांधकाम परवान्यासाठी नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. तेथे एजंटांचा सुळसुळाट आहे. या एजंटांकरवीच गुंठेवारीत बांधकाम परवाना दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवाना न घेताच घर बांधणे पसंद करतात. सध्या शहरात हजारो बांधकामे झाली आहेत, तसेच नवीन सुरू आहेत. गुंठेवारी नियमित असलेल्या भूखंडावरही पालिकेचा परवाना न घेता बांधकामे करण्यात आली आहेत. अशा बांधकामांनाही नगररचना विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. अशी बांधकामे काढणे म्हणजे सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. शहरातील काही प्रभागातील रस्त्यांची शिल्लक असलेली जागाही भूखंड माफियांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते आणि गटारी करणे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. काहींनी रस्त्यावरच बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत. अशा मालमत्ताधारकांनाही प्रशासनाने अभय दिले आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे चित्र असल्याने बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय ठरणार आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाची बेकायदा बांधकामाबाबतची भूमिका येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.शहरातील बेकायदा बांधकाम हे सत्ताधाऱ्यांचे पाप आहे. गुंठेवारी नियमित करणे व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी नगररचना विभागाची पायरी चढणे सर्वसामान्यांना अशक्य आहे. याचाच परिणाम शहरातील विनापरवाना बांधकाम वाढण्यावर झाला आहे. शासन निर्णयानुसार त्यांच्यावर ठराविक दंडात्मक कारवाई करून बांधकाम कायम करावे.-विजय कुंभार, विरोधी पक्षनेते....जेथे नगराध्यक्षच कायदा मोडतातइस्लापूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी पूर्वी कागदपत्रांचा घोटाळा करून स्वत:चेच बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याची तक्रार माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. जेथे नगराध्यक्षच कायदा मोडून बांधकाम करतात, तर सर्वसामान्यांनी असे बांधकाम केले तर काय बिघडले, असा सवाल उपस्थित होत आहे.