शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे अशक्य

By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST

विकास आराखडा अंतिम टप्प्यात : इस्लामपूर पालिकेतील नगररचना विभागाचा भोंगळ कारभार

अशोक पाटील - इस्लामपूर  --इस्लामपूरचा नियोजित विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. याचाच फायदा घेऊन सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने बिल्डर, धनदांडग्यांना बेकायदेशीर बांधकामासाठी अभय दिले आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांतील काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील हजारो बेकायदेशीरपणे बांधकामांवर हातोडा मारणे हे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान असणार आहे.इस्लामपुरात १९८० नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम परवाना मिळवणे मोठे आव्हान ठरत आहे. नगरपालिकेच्या नगररचना विभागात सर्वसामान्यांना गुंठेवारी नियमितीकरण आणि बांधकाम परवान्यासाठी नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. तेथे एजंटांचा सुळसुळाट आहे. या एजंटांकरवीच गुंठेवारीत बांधकाम परवाना दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवाना न घेताच घर बांधणे पसंद करतात. सध्या शहरात हजारो बांधकामे झाली आहेत, तसेच नवीन सुरू आहेत. गुंठेवारी नियमित असलेल्या भूखंडावरही पालिकेचा परवाना न घेता बांधकामे करण्यात आली आहेत. अशा बांधकामांनाही नगररचना विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. अशी बांधकामे काढणे म्हणजे सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. शहरातील काही प्रभागातील रस्त्यांची शिल्लक असलेली जागाही भूखंड माफियांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते आणि गटारी करणे पालिकेपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. काहींनी रस्त्यावरच बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत. अशा मालमत्ताधारकांनाही प्रशासनाने अभय दिले आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे चित्र असल्याने बेकायदा बांधकामावर हातोडा मारणे सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय ठरणार आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाची बेकायदा बांधकामाबाबतची भूमिका येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.शहरातील बेकायदा बांधकाम हे सत्ताधाऱ्यांचे पाप आहे. गुंठेवारी नियमित करणे व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी नगररचना विभागाची पायरी चढणे सर्वसामान्यांना अशक्य आहे. याचाच परिणाम शहरातील विनापरवाना बांधकाम वाढण्यावर झाला आहे. शासन निर्णयानुसार त्यांच्यावर ठराविक दंडात्मक कारवाई करून बांधकाम कायम करावे.-विजय कुंभार, विरोधी पक्षनेते....जेथे नगराध्यक्षच कायदा मोडतातइस्लापूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी पूर्वी कागदपत्रांचा घोटाळा करून स्वत:चेच बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याची तक्रार माजी नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. जेथे नगराध्यक्षच कायदा मोडून बांधकाम करतात, तर सर्वसामान्यांनी असे बांधकाम केले तर काय बिघडले, असा सवाल उपस्थित होत आहे.