शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अंतर्मुख करणारे ‘अग्निदिव्य’--

By admin | Updated: November 27, 2015 00:42 IST

राज्य नाट्य स्पर्धा

श्री हनुमान तरुण मंडळ (काळम्मावाडी) या संस्थेने गेल्या पंधरा-वीस वर्षांत सुनील माने, प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल केली आहे. आधुनिक नाट्य तंत्रापासून ‘कोसो दूर’ असलेल्या या मंडळींनी कमतरतेवर मात करत कोल्हापूर केंद्रावर बघता-बघता आपल्या संस्थेचा दबदबा निर्माण करून प्रस्थापितांना हादरे दिले आहेत. संस्थेच्या लौकिकाला योग्य असे नाटक ‘अग्निदिव्य’ करायचा प्रयत्न यावर्षी प्रकाश पाटील यांनी केला अन् तो काही त्रुटी वगळता यशस्वीही झाला आहे.समाजप्रबोधनासाठी रंगकर्मी सामाजिक आशय असलेली नाटके सातत्याने करताना आढळतात. ‘अग्निदिव्य’ नाटक हा त्यापैकीच एक प्रयत्न. भव्य नेपथ्यापेक्षा एक सशक्त, अंतर्मुख करायला लागणारा विचार महत्त्वाचा आहे, जो ‘अग्निदिव्य’ नाटकात आहे. उपलब्ध साहित्यांतून राजर्षी शाहू महाराजांचा नवा राजवाडा उभारायचा प्रयत्न झाला खरा; पण कलाकारांच्या हालचालींवर बंधने आली. खेरीज दुसरे दृश्य मांडताना आटापिटा करावा लागला नसता. एवढेही करून टिळकांच्या गायकवाड वाड्याच्या मागे अर्धा-मुर्धा झाकला गेलेला शाहू महाराजांचा वाडा प्रेक्षकांनी विनातक्रार स्वीकारला. सूचक नेपथ्यातून मोकळेपणानं आणि अंधार-उजेडाचे खेळ न करता मांडलेले नाटक पण प्रेक्षकांनी नक्कीच स्वीकारले असते. या नाटकातील शाहू महाराज आणि टिळक या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांना मोकळेपणानं वावरायला मुभा मिळाली असती. अशा नाटकांत सहजीशक्य असेल तरच नाटकातील वेळ, काळानुरूप वेशभूषेतील बदल स्वीकारावे लागतात. अन्यथा त्याची काहीच आवश्यकता नसते; शिवाय स्वीकारलेच तर सर्व पात्रांचा विचार व्हावा लागतो. एक पात्र नाटकभर एकाच पोशाखात आणि दुसरे वारंवार पोशाख बदलते, ही गोष्ट प्रेक्षकांना अतर्क्य वाटते. या नाटकाची प्रकाश योजना ठीकठाक होती; पण या सगळ्या झाल्या तांत्रिक बाजू आणि त्याही या प्रयोगातील. त्यामुळे बदल करण्यास किंवा सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. प्रकाश पाटील, सुनील माने सर्जक रंगकर्मी आहेत. त्यांनी याचा विचार केलाच असेल.कोल्हापुरातच अनधिकृत मंदिर, मशीद, चर्च यांची संख्या फोफावली असून नवपुरोहितांची संख्या पण फोफावली आहे. ट्रेनिंग आणि मार्केटिंगची ‘प्राईम लोकेशन्स’ म्हणून धार्मिक स्थळांचा आणि त्यांच्या व्यापाऱ्यांचा टीआरपी गगनाला भिडलेला असताना राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाबद्दल कुणाला आस्था वाटणार? शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेऊनच जर कर्मठ सनातनीसुद्धा आपलं दुकान लावतोय; तिथे इतरांची काय कथा? याउलट विचार मांडणारे, समाजाला दिशा देणारे, गोळ्या झेलून हकनाक मरताहेत म्हणजेच शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण आणि पुरोहित मंडळींचा त्या प्रकरणातील लांच्छनास्पद दुराग्रह ‘जैसे थे’च आहे. छत्रपती शाहू व टिळक यांच्या संबंधातील द्वंद्व हे नाटक ताकदीने मांडते व काळाच्या आणि जातीच्या चौकटीत मोठी माणसेही काहीवेळा किती संकुचित वागतात याचाही दाखला देते. हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करते. प्रकाश पाटील यांनी आपल्या टीमला घेऊन आपल्याकडील शंभर टक्के देण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न नक्कीच अभिनंदनाला पात्र आहे. ‘विशिष्ट श्रेष्ठमंडळींनीच असे प्रबोधननाट्य सादर करावे,’ या गैसमजालाही या नाटकाच्या प्रयोगाने खोडून काढले आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना समर्थ साथ दिल्यामुळे प्रयोग प्रेक्षणीय आणि श्रवणीय झाला. एखादे पात्र अडखळले तर तो अपघात समजण्याचा रसिकपणा आॅडिटोरिअम दाखवत होते आणि प्रयोग एकटक पाहत होते याहून आणखी काय हवे? प्रसन्न जी. कुलकर्णी