शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना काळात मातंग समाजावर अन्याय

By admin | Updated: December 24, 2015 23:54 IST

विट्यात सन्मान परिषद : विजय चांदणे यांचा आरोप

विटा : राज्यातील मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र ८ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाची माफी मागावी, अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा समतावादी महासंघाचे अध्यक्ष डॉ. विजय चांदणे यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या काळातही दलित मातंग समाजावर अन्यायच होत असल्याचा आरोप केला.विटा येथे समतावादी महासंघाच्यावतीने आयोजित केलेल्या सन्मान परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चांदणे बोलत होते. यावेळी माजी आ. राजू आवळे, प्रदेश कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे, राज्य संघटक गणेश माने, अतुल चव्हाण, सचिन भिसे, सचिन कमाने उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ. राजू आवळे म्हणाले, दलित समाजाच्या अनेक संघटना राज्यभर कार्यरत आहेत. या संघटनांत महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून कामे करणे आणि सत्तेला प्रमाण मानून कामे करणे, असे स्पष्ट दोन प्रवाह सध्या दिसत आहेत. जे समाजाच्या प्रश्नावर बोलत होते, तेच आता सत्तेसाठी जातीयवाद्यांच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळेच आजही समाजावर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांची सांगितले.या सन्मान परिषदेचे निमंत्रक व महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजावरील अन्यायाबद्दल समतावादी महासंघाने आपली भूमिका विशद केली असून भविष्यातही आक्रमक लढा उभारणार असल्याचे सांगितले. सुरेश ऐवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या परिषदेस संदीप धनवडे, संदीप सुतार, दिनकर ठोंबरे, विजय कांबळे, संजय ज. भिंंगारदेवे, महेश कांबळे, प्रा. दीपक तडाखे, नागरिक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)