शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

भाजप-शिवसेना काळात मातंग समाजावर अन्याय

By admin | Updated: December 24, 2015 23:54 IST

विट्यात सन्मान परिषद : विजय चांदणे यांचा आरोप

विटा : राज्यातील मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र ८ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाची माफी मागावी, अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा समतावादी महासंघाचे अध्यक्ष डॉ. विजय चांदणे यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या काळातही दलित मातंग समाजावर अन्यायच होत असल्याचा आरोप केला.विटा येथे समतावादी महासंघाच्यावतीने आयोजित केलेल्या सन्मान परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चांदणे बोलत होते. यावेळी माजी आ. राजू आवळे, प्रदेश कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे, राज्य संघटक गणेश माने, अतुल चव्हाण, सचिन भिसे, सचिन कमाने उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ. राजू आवळे म्हणाले, दलित समाजाच्या अनेक संघटना राज्यभर कार्यरत आहेत. या संघटनांत महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून कामे करणे आणि सत्तेला प्रमाण मानून कामे करणे, असे स्पष्ट दोन प्रवाह सध्या दिसत आहेत. जे समाजाच्या प्रश्नावर बोलत होते, तेच आता सत्तेसाठी जातीयवाद्यांच्या वळचणीला गेले आहेत. त्यामुळेच आजही समाजावर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांची सांगितले.या सन्मान परिषदेचे निमंत्रक व महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दलित समाजावरील अन्यायाबद्दल समतावादी महासंघाने आपली भूमिका विशद केली असून भविष्यातही आक्रमक लढा उभारणार असल्याचे सांगितले. सुरेश ऐवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या परिषदेस संदीप धनवडे, संदीप सुतार, दिनकर ठोंबरे, विजय कांबळे, संजय ज. भिंंगारदेवे, महेश कांबळे, प्रा. दीपक तडाखे, नागरिक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)