शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील १२१ गावांत दूषित पाणी : ग्रामपंचायतींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:48 IST

सांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना

ठळक मुद्देस्वच्छ पाण्याबाबत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार विचारणार जाबराज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील कासत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील,

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. दूषित पाणी नमुने आढळून आलेल्या बहुतांशी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील छोट्या पाणीपुरवठा योजना असणाºया ७० टक्के गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्राची उभारणीच केली नाही. काही गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्र सुरु असूनही तेथील यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

दर महिन्याच्या तपासणीमध्ये ६० ते १२५ गावांमध्ये दूषित पाणी आढळून येत आहे. दूषित पाण्याबाबत नोटिसा देण्यापलीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच केले नाही. काही गावांमध्ये तर गेल्या दोन वर्षापासून वारंवार दूषित पाण्याचे नमुने सापडत आहेत. या गावांवर जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील दोन हजार १९९ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी आटपाडी तालुक्यातील १७, जत ८, कवठेमहांकाळ १, मिरज ११, तासगाव १७, पलूस ३, वाळवा १९, शिराळा १७, खानापूर १३ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यापैकी बहुतांशी गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. येथील जागृत मतदार निश्चित दूषित पाण्याबाबत उमेदवारांना जाब विचारण्याची शक्यता आहे. पाच वर्षात दूषित पाण्यावर विरोधकांनीही कधी आवाज उठविलेला नाही आणि सत्ताधाºयांनी तर त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे, नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील, असे बोलले जाते.पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातही दूषित पाणीमरळनाथपूर (ता. वाळवा) हे पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव आहे. या गावातील आॅगस्ट महिन्यातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. याबद्दल ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने नोटीस बजावून, दूषित पाण्याबाबत काळजी घेण्याची सूचना दिली आहे. राज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील का, असा प्रश्न आहे.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : बनपुरी, आवळाई, गळवेवाडी, कामथ, घाणंद, खरसुंडी, निंबवडे, मुढेवाडी, बाळेवाडी, तळेवाडी, यपावाडी, भिंगेवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, हिवतड, नेलकरंजी, आटपाडी. जत तालुका : पांडोझरी, खोजानवाडी, बसर्गी, गुगवाड, उमदी, हळ्ळी, डोर्ली, बाज. कवठेमहांकाळ तालुका : आगळगाव. मिरज तालुका : तुंग, कवठेपिरान, पाटगाव, कळंबी, लिंगनूर, डोंगरवाडी, खंडेराजुरी, मल्लेवाडी, बुधगाव, बिसूर. तासगाव तालुका : वायफळे, यमगरवाडी, कौलगे, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावळज, चिंचणी, भैरववाडी, लोढे, वासुंबे, नागाव, शिरगाव, ढवळी, मणेराजुरी, धुळगाव, जुळेवाडी. पलूस तालुका : तुपारी, वसगडे, धनगाव. वाळवा तालुका : वाटेगाव, नेर्ले, भाटवाडी, केदारवाडी, माणिकवाडी, मरळनाथपूर, रेठरेधरण, नायकलवाडी, सुरूल, रोझावाडी, ढवळी, साखराळे, शिरगाव, पडवळवाडी, वाळवा, बावची, पोखर्णी, गोटखिंडी, नागाव. शिराळा तालुका : उपवळे, अंत्री बु., अंत्री खुर्द, देववाडी, जांभळेवाडी, मांगले, शिरसी, गिरजवडे, धामवडे, घागरेवाडी, बांबवडे, पाचुंब्री, पुनवत, कणदूर, चिखली, भाटशिरगाव. खानापूर तालुका : भाळवणी, जाधवनगर, मंगरूळ, पारे, गार्डी, घानवड, आळसंद, वाझर, भांबर्डे, वासुंबे, वलखड, वेजेगाव, भिकवडी. कडेगाव तालुका : विहापूर, कडेपूर, सोहोली, वडीयेरायबाग, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, तडसर, देवराष्ट्रे, चिंचणी, रामापूर, कुंभारगाव, अंबक, सोनकिरे, उपाळे मायणी, वांगी या गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.