शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

सांगली जिल्ह्यातील १२१ गावांत दूषित पाणी : ग्रामपंचायतींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:48 IST

सांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना

ठळक मुद्देस्वच्छ पाण्याबाबत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार विचारणार जाबराज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील कासत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील,

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. दूषित पाणी नमुने आढळून आलेल्या बहुतांशी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील छोट्या पाणीपुरवठा योजना असणाºया ७० टक्के गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्राची उभारणीच केली नाही. काही गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्र सुरु असूनही तेथील यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

दर महिन्याच्या तपासणीमध्ये ६० ते १२५ गावांमध्ये दूषित पाणी आढळून येत आहे. दूषित पाण्याबाबत नोटिसा देण्यापलीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच केले नाही. काही गावांमध्ये तर गेल्या दोन वर्षापासून वारंवार दूषित पाण्याचे नमुने सापडत आहेत. या गावांवर जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील दोन हजार १९९ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी आटपाडी तालुक्यातील १७, जत ८, कवठेमहांकाळ १, मिरज ११, तासगाव १७, पलूस ३, वाळवा १९, शिराळा १७, खानापूर १३ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यापैकी बहुतांशी गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. येथील जागृत मतदार निश्चित दूषित पाण्याबाबत उमेदवारांना जाब विचारण्याची शक्यता आहे. पाच वर्षात दूषित पाण्यावर विरोधकांनीही कधी आवाज उठविलेला नाही आणि सत्ताधाºयांनी तर त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे, नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील, असे बोलले जाते.पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातही दूषित पाणीमरळनाथपूर (ता. वाळवा) हे पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव आहे. या गावातील आॅगस्ट महिन्यातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. याबद्दल ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने नोटीस बजावून, दूषित पाण्याबाबत काळजी घेण्याची सूचना दिली आहे. राज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील का, असा प्रश्न आहे.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : बनपुरी, आवळाई, गळवेवाडी, कामथ, घाणंद, खरसुंडी, निंबवडे, मुढेवाडी, बाळेवाडी, तळेवाडी, यपावाडी, भिंगेवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, हिवतड, नेलकरंजी, आटपाडी. जत तालुका : पांडोझरी, खोजानवाडी, बसर्गी, गुगवाड, उमदी, हळ्ळी, डोर्ली, बाज. कवठेमहांकाळ तालुका : आगळगाव. मिरज तालुका : तुंग, कवठेपिरान, पाटगाव, कळंबी, लिंगनूर, डोंगरवाडी, खंडेराजुरी, मल्लेवाडी, बुधगाव, बिसूर. तासगाव तालुका : वायफळे, यमगरवाडी, कौलगे, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावळज, चिंचणी, भैरववाडी, लोढे, वासुंबे, नागाव, शिरगाव, ढवळी, मणेराजुरी, धुळगाव, जुळेवाडी. पलूस तालुका : तुपारी, वसगडे, धनगाव. वाळवा तालुका : वाटेगाव, नेर्ले, भाटवाडी, केदारवाडी, माणिकवाडी, मरळनाथपूर, रेठरेधरण, नायकलवाडी, सुरूल, रोझावाडी, ढवळी, साखराळे, शिरगाव, पडवळवाडी, वाळवा, बावची, पोखर्णी, गोटखिंडी, नागाव. शिराळा तालुका : उपवळे, अंत्री बु., अंत्री खुर्द, देववाडी, जांभळेवाडी, मांगले, शिरसी, गिरजवडे, धामवडे, घागरेवाडी, बांबवडे, पाचुंब्री, पुनवत, कणदूर, चिखली, भाटशिरगाव. खानापूर तालुका : भाळवणी, जाधवनगर, मंगरूळ, पारे, गार्डी, घानवड, आळसंद, वाझर, भांबर्डे, वासुंबे, वलखड, वेजेगाव, भिकवडी. कडेगाव तालुका : विहापूर, कडेपूर, सोहोली, वडीयेरायबाग, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, तडसर, देवराष्ट्रे, चिंचणी, रामापूर, कुंभारगाव, अंबक, सोनकिरे, उपाळे मायणी, वांगी या गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.