शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

रघुनाथदादा पाटील : शेतकऱ्यांच्याप्रश्नी २७ रोजी पुण्यात मोर्चा

सांगली : शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. सत्तेबाहेर असताना थेट शेतकऱ्यांना चारा देण्याची घोषणा करणारे हे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना पोसण्याचे निर्णय घेत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळाच्या प्रश्नासह गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा, यांसह अन्य मागण्यांसाठी दि. २७ मे रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादनावर ५० टक्के नफा देण्याची घोषणा करीत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत चारा पोहोच करण्याचे आश्वासन देत होते. याच नेत्यांना सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे तर लांबच, पण, सध्या प्रत्येक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात केले जात आहेत. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी कधी करणार आहात, याचाही आंदोलनात जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.आंदोलनात मराठा सेवा संघ, छावा संघटना, राष्ट्रीय छावा संघटना, मराठा महासंघ, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, कुरैश जमाअत, आम आदमी पार्टी, देश बचाओ आघाडीसह इतर संघटना सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)आंदोलकांच्या प्रमुख मागण्या...गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करादोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द कराउत्पादन खर्चावर आधारित किमती न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्यांना कर्जमुक्त कराबैलगाडी शर्यत बंदी उठवासर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवाशासनाने नाफेडमार्फत त्वरित कांदा खरेदी सुरु करावी