शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

रघुनाथदादा पाटील : शेतकऱ्यांच्याप्रश्नी २७ रोजी पुण्यात मोर्चा

सांगली : शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. सत्तेबाहेर असताना थेट शेतकऱ्यांना चारा देण्याची घोषणा करणारे हे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना पोसण्याचे निर्णय घेत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळाच्या प्रश्नासह गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा, यांसह अन्य मागण्यांसाठी दि. २७ मे रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादनावर ५० टक्के नफा देण्याची घोषणा करीत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत चारा पोहोच करण्याचे आश्वासन देत होते. याच नेत्यांना सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे तर लांबच, पण, सध्या प्रत्येक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात केले जात आहेत. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी कधी करणार आहात, याचाही आंदोलनात जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.आंदोलनात मराठा सेवा संघ, छावा संघटना, राष्ट्रीय छावा संघटना, मराठा महासंघ, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, कुरैश जमाअत, आम आदमी पार्टी, देश बचाओ आघाडीसह इतर संघटना सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)आंदोलकांच्या प्रमुख मागण्या...गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करादोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द कराउत्पादन खर्चावर आधारित किमती न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्यांना कर्जमुक्त कराबैलगाडी शर्यत बंदी उठवासर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवाशासनाने नाफेडमार्फत त्वरित कांदा खरेदी सुरु करावी