शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

पुलांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग

By admin | Updated: September 20, 2016 00:04 IST

चंद्रकांतदादा पाटील : विटा-कऱ्हाड रस्त्याच्या रुंदीकरणाचा विट्यामध्ये प्रारंभ

विटा : राज्यातील पुलांची देखभाल-दुरूस्ती व उभारणीसाठी स्वतंत्र विभाग केला असून, त्यासाठी सहा विभागात सहा शाखा सुरू होत आहेत. राज्यातील सर्वच पुलांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करणे हे त्या विभागाचे काम आहे. ज्या पुलांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या पुलांची दुरुस्ती करण्यात येईल. जे वाहतुकीसाठी योग्य नाहीत, त्या पुलांची नव्याने उभारणी करण्यात येईल, असे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. येथील विटा-कऱ्हाड रस्त्याच्या रूंदीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार कल्पना ढवळे, मकरंद देशपांडे उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सावित्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. राज्यात धोकादायक लहान-मोठे मिळून २० हजारहून अधिक पूल आहेत. यामधील काही पूल धोकादायक आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र हे सर्वच पूल एकावेळी पाडून नव्याने बांधणे शक्य नाही. त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात राज्यातील धोकादायक पुलांवर रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून, आठ तासांच्या शिफ्टमध्ये तीन पहारेकऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबतीत आॅगस्ट महिन्यात पुणे येथे विभागातील आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल. विजापूर-गुहागर मार्गावरील कऱ्हाड ते विटा मार्गावरील होणाऱ्या कामाबाबत आमदार अनिल बाबर पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. विनोद गोसावी, राजाराम गरुड, सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी उपसभापती सुहास बाबर, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक दिलीप आमणे, बाळासाहेब लकडे, प्रकाश बागल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धोंडीराम रास्कर, कृष्णदेव शिंदे, गणपतराव भोसले, दिलीप कीर्दत, राजू जाधव, अभिजित कदम, राजू मुल्ला, समीर कदम, सुधीर जाधव यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)मराठा क्रांती मोर्चा : सरकार सकारात्मक