शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

'‘वाढीव नळपाणी’चा बागुलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:13 IST

निवडणूक डोळ्यासमोर : पाण्याचा अनुशेष भरण्यासाठी नवा बहाणा

प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -गेल्या आठ वर्षांत रत्नागिरीकरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असताना आता घाई-गडबडीत पाण्याचा अनुशेष भरून काढण्याचा नवा बहाणा कारभाऱ्यांना मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर ६८ कोटींच्या वाढीव नळपाणी योजनेचा बागुलबुवा रत्नागिरीकरांसमोर उभा करण्यात आला आहे. हा बागुलबुवा खरोखरच सत्यात उतरणार की आश्वासनांचे पोतडे आणखी एका आश्वासनाने भरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही योजना मतांच्या आशेने लोकांच्या तोंडावर फेकल्या जातात. त्यात राजकीय गणितांची जुळवाजुळव असते, हे न समजण्याएवढी जनता आता खुळी राहिलेली नाही. सैन्य पोटावर चालते. त्यांना पोटापाण्याची रसद पुरवली नाही, तर ते लढू शकणार नाही. तसेच पाण्याच्याबाबत आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु पाण्याचाही जीवन - मरणाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांच्या काळात गंभीर बनलेला असतानाही त्या त्या वेळच्या कारभाऱ्यांना तो सोडवता आला नाही. कागदावर पाणी वाहात राहिले ते नळातून आलेच नाही. त्यामुळे अपुऱ्या पाणी समस्येला रत्नागिरीकरांना सातत्याने अनेक वर्षे तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या घरी नळाला पुरेसे पाणी आले नाही. मात्र, पाणी समस्येने त्यांच्या डोळ्यात या कारभाऱ्यांनी पाणी आणले, हे कटू सत्य आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शासनाकडे रत्नागिरीसाठी वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव दिला. गेल्या आठवड्यात वाढीव पाणी योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवा, असा आदेश आला. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत ६८.४० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ठराव गेल्या शुक्रवारी विशेष सभेत मंजूर करून तो शासनाला पाठवण्यात आला आहे. खरेतर नगरोत्थान योजना दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यावेळेपासून रत्नागिरीच्या नळपाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी निधी मागण्याचा विषय सुरू होता. असे असताना गेल्या वर्षभरात केवळ चर्चाच होत राहिली. आता निवडणुकांच्या तोंडावर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याआधी असा प्रस्ताव गेला असता तर एवढ्यात या योजनेचे नूतनीकरण पूर्णही झाले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्याचे कारण असल्याचा आरोप शहरवासीय करीत आहेत. शासनाकडे पाठवलेल्या या ६८.४० कोटींच्या प्रस्तावानुसार शीळ ते साळवी स्टॉप व पानवल ते नाचणेपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. या दोन्ही जलवाहिन्या गंजल्या असून जागोजागी फुटल्या आहेत. त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असून, वाया जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील जलवाहिन्यांचे जुने जाळे पूर्णत: काढून त्याजागी ४ इंचापेक्षा अधिक व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरातील पाणी वितरण जाळे अमुलाग्र बदलणार आहे. शहरात जुन्या यंत्रणेनुसार ४६ ठिकाणी पाणी वितरणाचे व्हॉल्व आहेत. नवीन योजनेच्या अंमलबजावणीत शहरात केवळ १६ व्हॉल्व राहणार आहेत. या १६ ठिकाणांवरूनच संपूर्ण शहरात एकाचवेळी पाणी सोडले जाणार असून, अवघ्या चार तासांत शहरातील पाणी वितरण होणार असल्याचा दावा नगराध्यक्ष मयेकर हे करीत आहेत. रत्नागिरीकरांसमोर या वाढीव नळपाणी योजनेच्या निमित्ताने अतिशय चांगले सप्तरंगी चित्र रंगवण्यात आले आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार व आता पावसाळा तोंडावर असल्याने व पुढे निवडणूक आचारसंहिता असल्याने वाढीव नळपाणी योजनेचे काम मंजूर झाल्यास होणार कधी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. निवडणुकीआधी योजनेचे काम होणे दुरापास्तरत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीआधी वाढीव नळपाणी योजनेचे काम होणे सध्यातरी दुरापास्त आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहेच. त्याचप्रमाणे या योजनेचा मुद्दा निवडणुकीत मांडून मतांचे राजकारण होणार नाही कशावरून, अशीही चर्चा सुरू झाली आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर वाढीव नळपाणी योजनेचा उभा करण्यात आलेला हा बागुलबुवा स्वप्नरंजन ठरू नये, तर शहराला पाणी मिळावे, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. पाण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा थांबविण्याची आशा आहे.