शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची वाढती रुग्णसंख्या चिंतनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सध्या स्थिर असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. ...

सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सध्या स्थिर असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने निदान झालेल्या रुग्णांवर मध्यवर्ती ठिकाणीच उपचार व्हावेत, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, म्युकरमायकोसिस रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारांचे नियोजन करावे. या रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती अधिक काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाइन वर्कशॉप घ्यावा. यामुळे इतर डॉक्टरांनाही याची माहिती होऊन रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. आरोग्य यंत्रणेने म्युकरमायकोसिसची पुढील काळात रुग्णसंख्या कितीपर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेत आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

चौकट

पालकमंत्री पाटील म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यात ७२ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे. खासगी रुग्णालयांनी कोविडसदृश रुग्ण आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक केल्याने त्याचा चांगला उपयोग होऊन अशा रुग्णांचा पुढील धोका टाळणे शक्य होणार आहे.