शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचे उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. ...

कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रातील चांगला कारखाना म्हणून त्याचा नावलौकिक आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे नूतन अध्यक्ष युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवाद व ड्रोनद्वारे औषध फवारणीचे तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीचे उपाध्यक्ष सुभाष जमदाडे यांनी गट शेतीबाबत मार्गदर्शन केले.

कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर विठ्ठलवाडी येथे २ वर्षांपासून सुरू असणाऱ्या गटशेतीची माहिती दिली व ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केल्यास पाणी पुरवठा योजनेद्वारे ठिबक सिंचन व शेततळे ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी कारखाना संचालक भीमराव पाटील, भगवान पाटील, सुभाष जमदाडे, छाया पाटील, सुनील पाटील, शेती अधिकारी प्रशांत पाटील, डी. एम. पाटील, संजय पाटील, विलास बाळू माने, प्रा. अनिल पाटील, तानाजी माने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी स्वागत केले. रवींद्र पाटील व मारुती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- १३०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज

कामेरी येथे उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवादात प्रतीक जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रणजित पाटील, सुभाष जमदाडे, भीमराव पाटील, छाया पाटील, सुनील पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.