शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

आष्ट्यात अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती थंडावली

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

पुरेशा पोलीस बंदोबस्ताचा अभाव : ३९ खोकीधारकांकडून हमीपत्र सादर

आष्टा : आष्टा शहरातील पेठ-सांगली रस्त्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणाबाबत हमीपत्र देण्याची ३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याची जय्यत तयारी केली. मात्र पोलीस फौजफाटा अद्यापही न मिळाल्याने ही मोहीम तात्पुरती थंडावली आहे. मात्र अतिक्रमण निघणार, हे निश्चित झाल्यानंतर सुमारे ३९ खोकीधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हमीपत्र सादर केले. उर्वरित खोकीधारकही हमीपत्र देण्यासाठी धावाधाव करीत असून, काही व्यावसायिकांनी स्वत:हून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. आष्टा बसस्थानकासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे १२७ व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकामच्या जागेत लोखंडी खोकी टाकून सायकल दुरुस्ती, आॅटो पार्टस्, गॅरेज, बेकरी, स्टेशनरी, सलून, नाष्टा सेंटर यांसह विविध व्यवसाय गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सुरु ठेवले आहेत. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटरऐवजी ११ मीटरवर गटार, फूटपाथ आल्याने अनेक खोकीधारकांनी लाखो रुपये खर्चून दुकाने मागे घेतली. मात्र शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. हे अतिक्रमण तीन दिवसात काढण्याबाबत त्यांना १८ जानेवारीस नोटीस देण्यात आली. सर्व खोकीधारकांनी दुकने तीन दिवस बंद ठेवून आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, वैभव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे यांची भेट घेऊन, खोकी वाचविण्याबाबत विनंती केली. विलासराव शिंदे, वैभव शिंदे, सुनील माने, शैलेश सावंत यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन, दुकाने वाचविण्याची व पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी २0 जानेवारीच्या बैठकीत, तीन फेब्रुवारीअखेर सर्व खोकीधारकांनी हमीपत्र दिल्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची ग्वाही दिली. मात्र तीन फेब्रुवारीअखेर एकाही खोकीधारकाने हमीपत्र दिले नाही. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अतिक्रमणे काढण्यासाठी एक्साव्हेटर, जेसीबी, डंपर, ट्रॉली, तसेच पालिकेचे व सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी यांसह जय्यत तयारी केली. मात्र त्यांनी आष्टा पोलीस ठाण्याकडे पोलीस देण्याची मागणी करुनही अद्यापही पोलीस उपलब्ध न झाल्याने, अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस खाते सहकार्य करणार, की पोलीस उपलब्ध नसल्याचे कारण देत मोहीम रखडणार, याबाबत खोकीधारकांत अस्वस्थता आहे. ४ फेब्रुवारी रोजी पाच खोकीधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हमीपत्र सादर केले, तर दि. ५ रोजी सुमारे ३४ खोकीधारक हमीपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र उशीर झाल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी हमीपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. सर्वांनी विनंती केल्यानंतर दुपारी ४.३0 च्या दरम्यान रघुवीर कापसे, सलीम मुजावर, आयेशा कुलकर्णी, दिलावर मुजावर, अनिल भोसले, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत बुधावले, श्रीधर शेट्टी, जमीर लतीफ, अभिजित माने, शहाजी डोंगरे, केशव चोपडे आदी ३४ खोकीधारकांनी हमीपत्र सादर केले. एकूण ३९ खोकीधारकांनी हमीपत्र दिले आहे. काही खोकीधारक सार्वजनिक बांधकामच्या जागेतील अतिक्रमण स्वत:हून काढून घेत आहेत. हॉटेल समृध्दीचे राकेश सावळवाडे, लक्ष्मी बिअर बारचे व लक्ष्मी बेकरीचे सार्वजनिक बांधकामच्या जागेतील दुकानगाळे, पत्रे छपरी व इतर सामान खोकीधारकांनी स्वत:हून काढून घेतले आहे. (वार्ताहर) हमीपत्र न देणाऱ्यांवर कारवाई : गाताडे