शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

वीज वितरणचा कारभार सुधारा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

ओळ : आसद येथे घरगुती व शेतीपंपाची वाढीव बिले यासंदर्भात श्रीदास होनमाने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय जाधव, ...

ओळ : आसद येथे घरगुती व शेतीपंपाची वाढीव बिले यासंदर्भात श्रीदास होनमाने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय जाधव, दीपक लाड, डी. एस. देशमुख, अमोल चव्हाण उपस्थित हाेते.

देवराष्ट्रे : गेले सात वर्षे शेतीपंपाचे कोणतेही रिडिंग घेतलेले नाही. ज्या मीटरचे रिडिंग घेतलेले नाही, ते बिल कलम २००३/५६ नुसार अनिवार्य नाही. असा महावितरणचा ग्राहकांच्या बाजूने नियम आहे. परंतु या नियमाला महावितरण कंपनी केराची टोपली दाखवून शेतीपंपाचे अव्वाच्या सव्वा बिल शेतकऱ्यांना देऊन सक्तीने वसूल करत आहे. तसेच घरगुती वीज बिलांचे चुकीचे रिडिंग दुरुस्त न करता कनेक्शन तोडण्याची कारवाई करत आहे. याविरोधात ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा श्रीदास होनमाने यांनी दिला आहे.

घरगुती व शेतीपंपाच्या वाढीव बिलासंदर्भात आसद (ता. कडेगाव) येथे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी होनमाने बोलत होते. यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख, दीपक लाड, संग्राम जाधव उपस्थित होते.

नवीन कनेक्शनला अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत महावितरण कंपनीने कनेक्शन देणे बंधनकारक आहे. परंतु कंपनीकडे ग्राहकाला वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. या कारभारामध्ये सुधारणा न झाल्यास कडेगाव पलूस तालुक्यातील सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल चव्हाण म्हणाले, शेतकरी हा गेली दीड वर्षे महापूर, अतिवृष्टी, कोरोना व अवकाळी अशा अनेक संकटांना तोंड देऊन कसातरी सावरत आहे. त्यात महावितरणने शेतकऱ्यास चुकीची हुकूमशाहीची बिल देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू.

यावेळी उपसरपंच विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील, सूरज जाधव, संदेश जाधव, गोरख औंधी, प्रकाश मोरे उपस्थित होते.