शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

देवराष्ट्रेत उत्स्फूर्त गाव बंद आंदोलन

By admin | Updated: February 4, 2015 00:02 IST

दिवसभर व्यवहार ठप्प : ‘आदर्श गाव’ कामे रखडली

कडेगाव : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त आदर्श गाव योजनेंतर्गत देवराष्ट्रेत झालेल्या कोट्यवधींच्या विकास कामांतील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामांची चौकशी व्हावी, रखडलेली कामे त्वरित पूर्ण व्हावीत, नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे, अशा मागण्यांसाठी आज मंगळवारी देवराष्ट्रे गाव बंद ठेवून आंदोलन केले.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने शासनाने देवराष्ट्रे गाव आदर्श गाव साकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाने जवळपास १८ कोटी रुपयांचा निधी दिला. परंतु येथे झालेली विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गटारीच नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वहात आहे. पाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी १ कोटी ६१ लाख रुपये खर्चूनही पुरेसे पाणी मिळत नाही. या कामाचीही चौकशी करावी, अशी मागणी देवराष्ट्रेतील ग्रामस्थांनी केली आहे. शासनाचे अधिकारी मात्र दररोज २ लाख ४ हजार लिटर पाणी पुरवठा होत असल्याचा दावा करीत आहेत. तसेच हे पाणी जाते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. देवराष्ट्रे येथील अनेक ग्रामस्थांचे अतिक्रमण काढले आहे. परंतु काही ग्रामस्थांनी आडमुठेपणाने अद्याप आपले अतिक्रमण काढून घेतलेले नाही. अशी अतिक्रमणे शासनाने तातडीने काढावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार किरण भिसे यांना देवराष्ट्रेतील ग्रामस्थांनी दिले. यावेळी बी. टी. महिंद, आर. वाय. पाटील, आनंदराव मोरे, ग्रा. पं. सदस्य प्रमोद गावडे, उपसरपंच भानुदास शिरतोडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)