शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

प्रकट मुलाखत : ज्येष्ठ रंगकर्मी जब्बार पटेल यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केला मनोदय

सांगली : सध्याच्या नाट्यअवकाशात मी योग्य कथा आणि कादंबरीच्या शोधात आहे. आजच्या काळातील भाषा मला सहजगत्या अवगत होईल, असे वाटत नाही. परंतु असे असले तरीही चांगल्या कथेच्या प्रतीक्षेत मी असून, प्रदीर्घ काळानंतर लवकरच नाट्यरंगभूमीवर पदार्पण करण्याचा विचार आहे. बघूया काय होते ते.., असे मत विष्णुदास भावे गौरव पदक सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मनमोकळ्या संवादात व्यक्त केले. डॉ. पटेल यांना रंगभूमीदिनानिमित्त येथे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुलाखतीत डॉ. पटेल बोलत होते. नाट्यदिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक आणि लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. मला भावे गौरव पदक मिळाले असले तरी, मी कोणत्याही प्रकारचे नाट्य प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे सांगून डॉ. पटेल म्हणाले की, तुम्हाला समाजात घडणाऱ्या विविध घटनांकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी असणे गरजेचे आहे. नाटकवेड्या माणसाला संध्याकाळचे सात वाजले की हमखास नाटकांची आठवण येतेच. अर्थात नाटकाचे वेड हे असेच असायला पाहिजे. सध्या मला अनेकजण म्हणतात की, कोणतीही कथा आणि कादंबरी घ्या आणि त्यावर नाटक अथवा चित्रपटाची निर्मिती करा; परंतु हे अशक्य आहे. कारण असे कधीच होत नाही. लेखक आणि दिग्दर्शक यांची भाषा एकरूप होणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत जी निर्मिती केली आहे, त्याकडे रसिकांनी चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास त्यांना याचा प्रत्यय येईल. मला लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. तरुणपणी मी प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत माझे गुरू विजय तेंडुलकर लिखित कथेवर आधारित नाटकात सहभाग घेतला होता. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकात मी भूमिकाही केली. डॉक्टरी पेशा स्वीकारल्यानंतर मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे प्रॅक्टिस सुरू केली. तरीही मला नाटक काही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नाटकाच्या तालमी करण्यासाठी मी जवळपास रोज पुण्याला ये-जा करीत असे. असा माझा दिनक्रम जवळपास १९७१ ते १९९७ पर्यंत सुरू होता. या काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’ रंगमंचावर आले. उत्तम नाटके निर्माण व्हावीत यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्याला रसिकांनी प्रतिसाद दिला. माणसाने सतत कार्यमग्न असणे गरजेचे असते. माझ्या जीवनात मला विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा मला पुढील वाटचालीसाठी नक्कीच झाला. नाटक, चित्रपटापेक्षा चरित्रपटाचे कार्य अवघड असते. त्यामध्ये उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचे दैवतीकरण होणार नाही, याचीही खबरदारी बाळगावी लागत असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दूरदर्शन क्षेत्रात काम नाहीसध्या डेली सोपचे फॅड आहे. दूरदर्शनवर सुरू असलेल्या या मालिकांमधील मुख्य दोष म्हणजे बहुतांशी मालिकांची कथाच तयार नसते. टीआरपी जसा बदलत जाईल, त्याप्रमाणात मालिकांची कथादेखील बदलत जाते. या प्रकाराला काहीही अर्थ नाही. वाट फुटेल तिकडे जाणारा कथाप्रकार मला मान्य नाही. तुमच्या डोक्यात तुमची कथा तयार पाहिजे. मग भले कमी भागात मालिका संपली तरी हरकत नाही. परंतु कथेत तडजोड करण्याची माझी वृत्ती नसल्याने भविष्यकाळात मी दूरदर्शन क्षेत्रात कार्य करीन, असे मला वाटत नसल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.