शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

प्रकट मुलाखत : ज्येष्ठ रंगकर्मी जब्बार पटेल यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केला मनोदय

सांगली : सध्याच्या नाट्यअवकाशात मी योग्य कथा आणि कादंबरीच्या शोधात आहे. आजच्या काळातील भाषा मला सहजगत्या अवगत होईल, असे वाटत नाही. परंतु असे असले तरीही चांगल्या कथेच्या प्रतीक्षेत मी असून, प्रदीर्घ काळानंतर लवकरच नाट्यरंगभूमीवर पदार्पण करण्याचा विचार आहे. बघूया काय होते ते.., असे मत विष्णुदास भावे गौरव पदक सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मनमोकळ्या संवादात व्यक्त केले. डॉ. पटेल यांना रंगभूमीदिनानिमित्त येथे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुलाखतीत डॉ. पटेल बोलत होते. नाट्यदिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक आणि लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. मला भावे गौरव पदक मिळाले असले तरी, मी कोणत्याही प्रकारचे नाट्य प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे सांगून डॉ. पटेल म्हणाले की, तुम्हाला समाजात घडणाऱ्या विविध घटनांकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी असणे गरजेचे आहे. नाटकवेड्या माणसाला संध्याकाळचे सात वाजले की हमखास नाटकांची आठवण येतेच. अर्थात नाटकाचे वेड हे असेच असायला पाहिजे. सध्या मला अनेकजण म्हणतात की, कोणतीही कथा आणि कादंबरी घ्या आणि त्यावर नाटक अथवा चित्रपटाची निर्मिती करा; परंतु हे अशक्य आहे. कारण असे कधीच होत नाही. लेखक आणि दिग्दर्शक यांची भाषा एकरूप होणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत जी निर्मिती केली आहे, त्याकडे रसिकांनी चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास त्यांना याचा प्रत्यय येईल. मला लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. तरुणपणी मी प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत माझे गुरू विजय तेंडुलकर लिखित कथेवर आधारित नाटकात सहभाग घेतला होता. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकात मी भूमिकाही केली. डॉक्टरी पेशा स्वीकारल्यानंतर मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे प्रॅक्टिस सुरू केली. तरीही मला नाटक काही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नाटकाच्या तालमी करण्यासाठी मी जवळपास रोज पुण्याला ये-जा करीत असे. असा माझा दिनक्रम जवळपास १९७१ ते १९९७ पर्यंत सुरू होता. या काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’ रंगमंचावर आले. उत्तम नाटके निर्माण व्हावीत यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्याला रसिकांनी प्रतिसाद दिला. माणसाने सतत कार्यमग्न असणे गरजेचे असते. माझ्या जीवनात मला विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा मला पुढील वाटचालीसाठी नक्कीच झाला. नाटक, चित्रपटापेक्षा चरित्रपटाचे कार्य अवघड असते. त्यामध्ये उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचे दैवतीकरण होणार नाही, याचीही खबरदारी बाळगावी लागत असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दूरदर्शन क्षेत्रात काम नाहीसध्या डेली सोपचे फॅड आहे. दूरदर्शनवर सुरू असलेल्या या मालिकांमधील मुख्य दोष म्हणजे बहुतांशी मालिकांची कथाच तयार नसते. टीआरपी जसा बदलत जाईल, त्याप्रमाणात मालिकांची कथादेखील बदलत जाते. या प्रकाराला काहीही अर्थ नाही. वाट फुटेल तिकडे जाणारा कथाप्रकार मला मान्य नाही. तुमच्या डोक्यात तुमची कथा तयार पाहिजे. मग भले कमी भागात मालिका संपली तरी हरकत नाही. परंतु कथेत तडजोड करण्याची माझी वृत्ती नसल्याने भविष्यकाळात मी दूरदर्शन क्षेत्रात कार्य करीन, असे मला वाटत नसल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.