शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘हायड्रोफोनिक’द्वारे चारा टंचाईवर यशस्वी मात...

By admin | Updated: May 25, 2016 00:18 IST

सकस चारा निर्मिती : कुमठेच्या कल्पना पाटील यांचा प्रकल्प

प्रदीप पोतदार -- कवठेएकंद कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर उत्तम पर्याय शोधला आहे. सकस व दर्जेदार चारा निर्मितीमुळे किफायतशीर पशुपालनाचा आदर्शच सिध्द केला आहे. कुमठे हे कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा असणारे गाव. आरफळ योजनेचे शेवटचे टोक असल्यामुळे पाण्यासाठीची पायपीट ठरलेलीच. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता. मग जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय बिकटच. मात्र कल्पना पाटील यांनी त्यावर मात केली. काही दिवसांपर्यंत पशुपालन करताना, संसाराला उभारी मिळायची. नुसत्या दूध-दुपत्यावर घराचा आर्थिक गाडा चालायचा. पण पशुखाद्य, सरकी पेंड, चारा यासारख्या घटकांचे दर वाढल्याने व दुधाचे दर मात्र त्या तुलनेत न वाढल्याने पशुपालन तोट्याचे ठरत आहे. त्याबरोबरच खराब हवामान, दुष्काळी परिस्थिती, कडक उन्हाळा यामुळे जनावरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत आहे. पाटील यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून हायड्रोफोनिक प्रकल्पातून अंकुरीत होणारा चारा जनावरांना दिला आहे. त्यातून चार जनावरांचे संगोपन करत आहेत. यासाठी १० बाय १५ फुटाच्या जागेत छोटा चार टप्प्यांचा रॅकचा सांगडा उभारला आहे. त्यामध्ये २१ प्लॅस्टिक ट्रेद्वारे मका, गहू यांचा अंकुरनिर्मित चारा दहा दिवसात उपलब्ध होतो. सुमारे २५ हजार रुपये खर्चून प्रकल्प उभा केला आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. प्रारंभी प्रयोगशील पध्दतीने हात स्प्रेने पाणी दिले जात होते. आता प्रकल्पातील अंकुरीत धान्याला एका तासाच्या अंतराने ३० सेकंद तुषार सिंचन पध्दतीने पाणी देण्याच्या स्वयंचलित पध्दतीचा अवलंब त्यांनी केला आहे. या प्रकल्पातून सकस चारा उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने कुमठेच्या कल्पना पाटील यांच्या प्रकल्पास अनेक कृषी विभाग, पशू विभागातील अधिकारी व सेवक वर्गाने भेटी दिल्या आहेत. जास्तीत जास्त पशुपालकांनी हा प्रकल्प करावा, यासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांनाही चारा देऊ केला. पशुपालनाबरोबरच गांडूळ खत निर्मिती, गोबर गॅस प्रणालीतूनही खतनिर्मिती करून सेंद्रीय शेतीवर भर दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले. कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर पर्याय शोधला आहे. दूध उत्पादनातही सुधारणाघरामध्ये कर्ती पुरूष मंडळी असतानाही जनावरांची जबाबदारी माझ्याकडेच आहे. कृषी प्रदर्शनातून या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. सकस चारा कमी खर्चात, कमी जागेत तयार होतो, हे सिध्द झाले. सरकी पेंड, पशुखांद्याचा वापर पूर्णपणे बंद केला तरीही दूध उत्पादनात वाढ असून दुधाचे फॅट वाढून दर्जा सुधारला असल्याचे कल्पना पाटील यांनी सांगितले.