शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

‘हायड्रोफोनिक’द्वारे चारा टंचाईवर यशस्वी मात...

By admin | Updated: May 25, 2016 00:18 IST

सकस चारा निर्मिती : कुमठेच्या कल्पना पाटील यांचा प्रकल्प

प्रदीप पोतदार -- कवठेएकंद कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर उत्तम पर्याय शोधला आहे. सकस व दर्जेदार चारा निर्मितीमुळे किफायतशीर पशुपालनाचा आदर्शच सिध्द केला आहे. कुमठे हे कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा असणारे गाव. आरफळ योजनेचे शेवटचे टोक असल्यामुळे पाण्यासाठीची पायपीट ठरलेलीच. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता. मग जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय बिकटच. मात्र कल्पना पाटील यांनी त्यावर मात केली. काही दिवसांपर्यंत पशुपालन करताना, संसाराला उभारी मिळायची. नुसत्या दूध-दुपत्यावर घराचा आर्थिक गाडा चालायचा. पण पशुखाद्य, सरकी पेंड, चारा यासारख्या घटकांचे दर वाढल्याने व दुधाचे दर मात्र त्या तुलनेत न वाढल्याने पशुपालन तोट्याचे ठरत आहे. त्याबरोबरच खराब हवामान, दुष्काळी परिस्थिती, कडक उन्हाळा यामुळे जनावरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत आहे. पाटील यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून हायड्रोफोनिक प्रकल्पातून अंकुरीत होणारा चारा जनावरांना दिला आहे. त्यातून चार जनावरांचे संगोपन करत आहेत. यासाठी १० बाय १५ फुटाच्या जागेत छोटा चार टप्प्यांचा रॅकचा सांगडा उभारला आहे. त्यामध्ये २१ प्लॅस्टिक ट्रेद्वारे मका, गहू यांचा अंकुरनिर्मित चारा दहा दिवसात उपलब्ध होतो. सुमारे २५ हजार रुपये खर्चून प्रकल्प उभा केला आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. प्रारंभी प्रयोगशील पध्दतीने हात स्प्रेने पाणी दिले जात होते. आता प्रकल्पातील अंकुरीत धान्याला एका तासाच्या अंतराने ३० सेकंद तुषार सिंचन पध्दतीने पाणी देण्याच्या स्वयंचलित पध्दतीचा अवलंब त्यांनी केला आहे. या प्रकल्पातून सकस चारा उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने कुमठेच्या कल्पना पाटील यांच्या प्रकल्पास अनेक कृषी विभाग, पशू विभागातील अधिकारी व सेवक वर्गाने भेटी दिल्या आहेत. जास्तीत जास्त पशुपालकांनी हा प्रकल्प करावा, यासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांनाही चारा देऊ केला. पशुपालनाबरोबरच गांडूळ खत निर्मिती, गोबर गॅस प्रणालीतूनही खतनिर्मिती करून सेंद्रीय शेतीवर भर दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले. कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर पर्याय शोधला आहे. दूध उत्पादनातही सुधारणाघरामध्ये कर्ती पुरूष मंडळी असतानाही जनावरांची जबाबदारी माझ्याकडेच आहे. कृषी प्रदर्शनातून या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. सकस चारा कमी खर्चात, कमी जागेत तयार होतो, हे सिध्द झाले. सरकी पेंड, पशुखांद्याचा वापर पूर्णपणे बंद केला तरीही दूध उत्पादनात वाढ असून दुधाचे फॅट वाढून दर्जा सुधारला असल्याचे कल्पना पाटील यांनी सांगितले.