शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

हॉटेल्स, किराणा दुकाने, मॉल्स, पानटपऱ्या रात्री आठनंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. ते १५ एप्रिलपर्यंत ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. ते १५ एप्रिलपर्यंत लागू राहतील. हॉटेल्स, किराणा दुकाने, बेकरी, हातगाडे, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद राहतील. हॉटेल्समधून पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला मात्र परवानगी राहणार आहे.

जिल्हाभरात जमावबंदी असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचा भंग करणाऱ्यास एक हजार रुपये दंड केला जाईल. बगीचे, मैदाने व सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहतील. मास्क नसल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड होईल. नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स सील केली जातील. त्याशिवाय दंड व कायदेशीर कारवाईही होईल.

गृह अलगीकरणातील व्यक्तींची माहिती डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायची आहे. रुग्णाच्या घरावर फलकही लावायचा आहे. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा लागेल. रुग्ण घराबाहेर पडल्यास संस्थात्मक अलगीकरण केले जाईल.

सरकारी कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद आहे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाची कामे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. एखाद्या बैठकीला येण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडून प्रवेशपत्र दिले जाईल. पत्राशिवाय प्रवेश नसेल.

सर्व धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखूनच भाविकांना प्रवेश देता येईल. दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणासारख्या सुविधाही द्यायच्या आहेत. मास्कचा वापर व शरीराचे तापमान मोजावे लागेल. सार्वजनिक वाहतुकीला सशर्त परवानगी आहे. अटींचा भंग केल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.

चौकट

असे असतील निर्बंध

- रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

- किराणा, बेकरी, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स, चित्रपटगृहे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद, पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला परवानगी

- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, सभागृह व नाट्यगृहातही कार्यक्रमांना बंदी

- लग्नासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई

चौकट

अंमलबजावणी सुरू

रविवारी संध्याकाळपासूनच पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. रात्री आठ वाजताच किराणा दुकाने, बेकरी बंद करायला लावल्या. किरकोळ भाजीविक्रेत्यांना व्यवसाय बंद करायला लावले. पानटपऱ्याही बंद केल्या. यामुळे शहर व ग्रामीण भागात रात्री आठनंतर सामसूम होती, रस्ते निर्मनुष्य झाले.