शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स, किराणा दुकाने, मॉल्स, पानटपऱ्या रात्री आठनंतर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. ते १५ एप्रिलपर्यंत ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्बंध जाहीर केले आहेत. ते १५ एप्रिलपर्यंत लागू राहतील. हॉटेल्स, किराणा दुकाने, बेकरी, हातगाडे, चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह रात्री आठनंतर बंद राहतील. हॉटेल्समधून पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला मात्र परवानगी राहणार आहे.

जिल्हाभरात जमावबंदी असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचा भंग करणाऱ्यास एक हजार रुपये दंड केला जाईल. बगीचे, मैदाने व सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहतील. मास्क नसल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड होईल. नियमांचे उल्लंघन केल्यास चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स सील केली जातील. त्याशिवाय दंड व कायदेशीर कारवाईही होईल.

गृह अलगीकरणातील व्यक्तींची माहिती डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायची आहे. रुग्णाच्या घरावर फलकही लावायचा आहे. रुग्णाच्या हातावर शिक्का मारावा लागेल. रुग्ण घराबाहेर पडल्यास संस्थात्मक अलगीकरण केले जाईल.

सरकारी कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंद आहे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्त्वाची कामे असलेल्यांनाच प्रवेश मिळेल. एखाद्या बैठकीला येण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडून प्रवेशपत्र दिले जाईल. पत्राशिवाय प्रवेश नसेल.

सर्व धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखूनच भाविकांना प्रवेश देता येईल. दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणासारख्या सुविधाही द्यायच्या आहेत. मास्कचा वापर व शरीराचे तापमान मोजावे लागेल. सार्वजनिक वाहतुकीला सशर्त परवानगी आहे. अटींचा भंग केल्यास ५०० रुपये दंड केला जाईल.

चौकट

असे असतील निर्बंध

- रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

- किराणा, बेकरी, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स, चित्रपटगृहे रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद, पार्सल सेवा, होम डिलिव्हरीला परवानगी

- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध, सभागृह व नाट्यगृहातही कार्यक्रमांना बंदी

- लग्नासाठी ५० व अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना मनाई

चौकट

अंमलबजावणी सुरू

रविवारी संध्याकाळपासूनच पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. रात्री आठ वाजताच किराणा दुकाने, बेकरी बंद करायला लावल्या. किरकोळ भाजीविक्रेत्यांना व्यवसाय बंद करायला लावले. पानटपऱ्याही बंद केल्या. यामुळे शहर व ग्रामीण भागात रात्री आठनंतर सामसूम होती, रस्ते निर्मनुष्य झाले.