शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

‘म्हैसाळ’ला टंचाईतूनच मदत करा

By admin | Updated: January 11, 2016 00:46 IST

पतंगराव कदम : तिजोरीत कधीच खडखडाट नसतो

सांगली : राज्याच्या तिजोरीत कधीच खडखडाट नसतो. दररोज शासनाकडे पैसा येत असतो. त्यामुळे टंचाईतून म्हैसाळ योजनेला पैसा देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने योजनेला मदत केली पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात आणि राज्यात सध्या वेगळे वातावरण आहे. दुष्काळ आणि पाणीप्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांना काय कळायचे ते कळलेले आहे. ‘म्हैसाळ’च्या प्रश्नावर सरकारनेच उपाय शोधला पाहिजे. आमच्या काळात टंचाईतून योजनांची बिले भागविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेतला होता. आताच्या सरकारनेही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन म्हैसाळ योजनेस मदत करावी. ताकारी योजनेची परिस्थिती वेगळी आहे. याठिकाणी कारखान्यांनी ऊस बिलातून वसुली करून योजनांची बिले भागविली. ‘म्हैसाळ’च्या परिस्थितीचा अभ्यास करून याठिकाणी उपाय शोधले पाहिजेत. सहकारी संस्थांची जी संचालक मंडळे बरखास्त झाली आहेत, त्यांची प्रथम चौकशी झाली पाहिजे. चौकशीत ते त्या भ्रष्टाचाराला जबाबदार असतील, तरच त्यांच्याविषयीचा पुढील निर्णय घ्यावा. सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया रचला गेला. त्यामुळे या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यादृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत. त्या मोडीत निघतील, अशापद्धतीने धोरण राबविणे चुकीचे ठरेल. मी सहकारमंत्री असताना कोणत्याही संस्था बरखास्त केल्या नाहीत. काही बँकांच्या बरखास्तीचा निर्णय नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार झाला होता. सहकार चळवळ अधिक मजबूत व्हावी, असे धोरण आम्ही स्वीकारले होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)...तर स्वबळावर आगामी जिल्हा परिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू. राष्ट्रवादीला सोबत येण्याची विनंती केली जाईल. ते सोबत आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढू, असे पतंगराव कदम म्हणाले.