शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

‘म्हैसाळ’ला टंचाईतूनच मदत करा

By admin | Updated: January 11, 2016 00:46 IST

पतंगराव कदम : तिजोरीत कधीच खडखडाट नसतो

सांगली : राज्याच्या तिजोरीत कधीच खडखडाट नसतो. दररोज शासनाकडे पैसा येत असतो. त्यामुळे टंचाईतून म्हैसाळ योजनेला पैसा देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने योजनेला मदत केली पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात आणि राज्यात सध्या वेगळे वातावरण आहे. दुष्काळ आणि पाणीप्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांना काय कळायचे ते कळलेले आहे. ‘म्हैसाळ’च्या प्रश्नावर सरकारनेच उपाय शोधला पाहिजे. आमच्या काळात टंचाईतून योजनांची बिले भागविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेतला होता. आताच्या सरकारनेही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन म्हैसाळ योजनेस मदत करावी. ताकारी योजनेची परिस्थिती वेगळी आहे. याठिकाणी कारखान्यांनी ऊस बिलातून वसुली करून योजनांची बिले भागविली. ‘म्हैसाळ’च्या परिस्थितीचा अभ्यास करून याठिकाणी उपाय शोधले पाहिजेत. सहकारी संस्थांची जी संचालक मंडळे बरखास्त झाली आहेत, त्यांची प्रथम चौकशी झाली पाहिजे. चौकशीत ते त्या भ्रष्टाचाराला जबाबदार असतील, तरच त्यांच्याविषयीचा पुढील निर्णय घ्यावा. सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया रचला गेला. त्यामुळे या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यादृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत. त्या मोडीत निघतील, अशापद्धतीने धोरण राबविणे चुकीचे ठरेल. मी सहकारमंत्री असताना कोणत्याही संस्था बरखास्त केल्या नाहीत. काही बँकांच्या बरखास्तीचा निर्णय नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार झाला होता. सहकार चळवळ अधिक मजबूत व्हावी, असे धोरण आम्ही स्वीकारले होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)...तर स्वबळावर आगामी जिल्हा परिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू. राष्ट्रवादीला सोबत येण्याची विनंती केली जाईल. ते सोबत आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढू, असे पतंगराव कदम म्हणाले.