शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

युवकांचे हृदयसम्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST

राजकारणावर पकड व समाजकारणाची जाण असणारे एक संयमी, अनुभवी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा समर्थपणे ...

राजकारणावर पकड व समाजकारणाची जाण असणारे एक संयमी, अनुभवी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा समर्थपणे चालविणारे युवा नेतृत्व विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांना लहानपणापासूनच समाजकारणाबरोबर राजकारणाचे बाळकडू मिळाले.

पतंगराव कदम साहेब यांच्या निधनानंतर विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून विक्रमी मताधिक्याने विधानसभेवर पाठविले. पतंगराव कदम साहेबांची पुण्याई, जनतेचा विश्वास, परिवारातील सर्व सदस्यांची लाभलेली साथ व काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपत आज बाळासाहेब राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

भारती विद्यापीठाचा कार्यवाहक व महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावर काम करत असताना मिळालेले अनुभव पाहता बाळासाहेबांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीचे सोने करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवून वडिलांच्या कार्यास साजेसे असे काम करणारे नेतृत्व महाराष्ट्र राज्याला लाभले आहे.

केवळ शैक्षणिक संस्था आणि राजकारण यापुरतेच त्यांचे काम मर्यादित नाही, तर त्यांनी हाती घेतलेले ‘मुलगी वाचवा अभियान’ही यशस्वीरीत्या राबवून महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्याचे कार्य केले. बाळासाहेबांनी सामाजिक कार्याबरोबर क्रीडा क्षेत्रातही चांगला ठसा उमटवला आहे.

महापूर असो की कोणतीही आपत्ती असो बाळासाहेब तेथे जातीने हजर असतात. आपल्या सर्व कार्यकर्त्यांची फौज मदतकार्यात सहभागी करून जनतेला आधार देत असतात. पुराच्या वेळी पूरग्रस्तांना राहण्याची, जेवणाची सोय दुधोंडी, रामानंदनगर, भिलवडी येथे केली. सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब यांच्याकडे पाहिले जाते.

पुण्यासारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत वाढलेल्या बाळासाहेबांचे नेतृत्व राज्याच्या पटलावर सुसंस्कृत नेतृत्व म्हणून उदयास येत आहे. ज्या क्षेत्रात जायचे, त्याचा चांगला अभ्यास करायचा. त्यातील अडचणी समजून घ्यायच्या आणि सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायचे, हा त्यांच्या स्वभावातील विशेष गुण आहे. अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी युवकांच्या हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळे ते युवकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. अत्यंत मनमिळावूपणा, आस्थेवाईकपणे चौकशी करणे, अडीअडचणी मनापासून समजावून घेणे, गरजूंना मदत करणे ही बाळासाहेबांची वृत्ती सर्वसामान्यांना आधार वाटत असते. अशा या लोकप्रिय युवक ह्रदयसम्राट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

- शिवाजीराजे जाधव, दुधोंडी,

संस्थापक -शिवभवानी उद्योग समूह, दुधोंडी.