शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST

माती तपासणीचा अहवाल : स्फुरद, पालाशचे प्रमाण घटले : सव्वालाख खातेदारांना आरोग्यपत्र मिळणार

अशोक डोंबाळे - सांगली केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाने सांगली जिल्ह्यातील एक लाख ११ हजार ६०३ खातेदारांच्या जमिनीचे माती व पाणी परीक्षण केले आहे. या शेतकऱ्यांना दि. ५ डिसेंबर रोजी त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. माती परीक्षणामध्ये जमिनीमधील स्फुरद, पालाश कमी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या जमिनीच्या खातेदार शेतकऱ्यांना रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर करण्याच्या कृषी विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाने २०१५ते २०१८ या तीन वर्षाचा आराखडा तयार केला आहे. तीन वर्षात जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार खातेदारांना त्यांच्या जमिनीचे आरोग्यपत्र देण्यात येणार आहे. बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने घेतले जात आहेत. यामुळे जमिनी क्षारपड होण्यापासून वाचविता येणार असून, एकरी उत्पादनही वाढण्यास मदत होणार आहे. म्हणूनच शासनाने या निर्णयास प्राधान्य दिल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील एक लाख एकराहून अधिक जमीन क्षारपड झाली आहे. एकरी उत्पादनही ५० टक्क्याने घटले आहे. जमिनीचा पोत न पाहता शेतकरी जादा उत्पादन मिळविण्यासाठी अती पाण्याचा आणि रासायनिक खताचा वापर करीत आहेत. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याऐवजी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच केंद्र शासनाने जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगलीतील जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ ते १८ असा तीन वर्षाचा जिल्ह्याचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी खरीप आणि रब्बी हंगामातील एक लाख ११ हजार ६०३ खातेदारांच्या जमिनीचे माती परीक्षण केले आहे. माती परीक्षणमध्ये जमिनीमध्ये स्फुरद, पालाशचे प्रमाण घटले आहे. रासायनिक खताचा चुकीच्या पध्दतीने वापर आणि पिकाला पाण्याची गरज न ओळखता पाणी दिले जात असल्यामुळे जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण खूप वाढले आहे. याबद्दलही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या गावांमधील मातीची झाली तपासणी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, आरवडे, चिंचणी, कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी, नेवरी, हिंगणगाव खु., खानापूर तालुक्यातील विटा, भाळवणी, पारे, ढवळेश्वर, आटपाडी तालुक्यातील बनपुरी, राजेवाडी, गोमेवाडी, झरे, कामथ, हिवतड, निंबवडे, वाळवा तालुक्यातील कासेगाव, आष्टा, नेर्ले, धोत्रेवाडी, शिरटे, जत तालुक्यातील उमदी, उटगी, संख, मिरज तालुक्यातील म्हैसाळ, खंडेराजुरी, आरग, सलगरे, वड्डी, शिराळा तालुक्यातील कांदे, शिराळा, सागाव, कणदूर, मांगले, पलूस तालुक्यातील नागठाणे, वसगडे, कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ, राजंणी या गावांचा समावेश आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने माती परीक्षणाचा महत्त्वपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे. यावर्षी आपण एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्यपत्र वाटप करणार आहे. याचा जमिनीचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून माती परीक्षण करून खताचा वापर करावा, असे जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार यांनी सांगितले.