शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या ताकदीवरच नगराध्यक्ष ठरणार

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

सक्षम चेहऱ्याचा शोध : विरोधकांकडे मात्र प्रभावी नेत्याचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी पाच वर्षांसाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कोणतेही आरक्षण पडले, तरी सत्ताधाऱ्यांकडे एकही नेता असा नाही, की तो स्वबळावर नगराध्यक्षपद मिळवू शकतो. ज्याच्या डोक्यावर आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त असेल, तोच भावी नगराध्यक्ष ठरणार आहे. याउलट विरोधी गटाचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी, विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याने जनेततून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांची ताकद विरोधकांच्या पाठीशी होती. त्यामुळेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात आनंदराव मलगुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. आता हे दोघेही जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. या दोघांनाही आता नगराध्यक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. जर नगराध्यक्ष पदासाठी ओ. बी. सी. आरक्षण पडले, तर आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे आणि संजय कोरे यांचा विचार राष्ट्रवादीतून होऊ शकतो.खुल्या पुरुष गटासाठी आतापासूनच विजयभाऊ पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु विजय पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी चालणारच नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात त्यांचेच काही हितचिंतक करू लागले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील हे पक्षाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. अन्यथा ते स्वत:च्या प्रभागात काय आरक्षण पडते यावर लक्ष ठेवून आहेत. यावरुन त्यांची रणनीती ठरणार आहे. महिलांमधून माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचे नाव घेतले जाते. या नावाला विरोध करण्यासाठी कोणतीही महिला पुढे येण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत.नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचारही जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. याउलट विरोधी गटाची अवस्था दयनीय आहे. खा. राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांच्या नेत्यांचे मनोमीलन झाले तरीही अंतिम टप्प्यात वादाला तोंड फुटते, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एल. एन. शहा यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना विरोधकांची कितपत साथ मिळेल, यावरच सर्वकाही अवलंबून आहे....तर विरोधकांना चांगले दिवस येतील येणाऱ्या काळात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दोघांची ताकद इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत एकवटली, तर विरोधकांना चांगले दिवस येतील. परंतु शहरातील गट नेत्यांच्यातच अंतर्गत मतभेद असल्याने विरोधकांकडे ताकद असूनही त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही.