शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जयंतरावांच्या ताकदीवरच नगराध्यक्ष ठरणार

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

सक्षम चेहऱ्याचा शोध : विरोधकांकडे मात्र प्रभावी नेत्याचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी पाच वर्षांसाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कोणतेही आरक्षण पडले, तरी सत्ताधाऱ्यांकडे एकही नेता असा नाही, की तो स्वबळावर नगराध्यक्षपद मिळवू शकतो. ज्याच्या डोक्यावर आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त असेल, तोच भावी नगराध्यक्ष ठरणार आहे. याउलट विरोधी गटाचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी, विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याने जनेततून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांची ताकद विरोधकांच्या पाठीशी होती. त्यामुळेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात आनंदराव मलगुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. आता हे दोघेही जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. या दोघांनाही आता नगराध्यक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. जर नगराध्यक्ष पदासाठी ओ. बी. सी. आरक्षण पडले, तर आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे आणि संजय कोरे यांचा विचार राष्ट्रवादीतून होऊ शकतो.खुल्या पुरुष गटासाठी आतापासूनच विजयभाऊ पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु विजय पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी चालणारच नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात त्यांचेच काही हितचिंतक करू लागले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील हे पक्षाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. अन्यथा ते स्वत:च्या प्रभागात काय आरक्षण पडते यावर लक्ष ठेवून आहेत. यावरुन त्यांची रणनीती ठरणार आहे. महिलांमधून माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचे नाव घेतले जाते. या नावाला विरोध करण्यासाठी कोणतीही महिला पुढे येण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत.नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचारही जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. याउलट विरोधी गटाची अवस्था दयनीय आहे. खा. राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांच्या नेत्यांचे मनोमीलन झाले तरीही अंतिम टप्प्यात वादाला तोंड फुटते, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एल. एन. शहा यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना विरोधकांची कितपत साथ मिळेल, यावरच सर्वकाही अवलंबून आहे....तर विरोधकांना चांगले दिवस येतील येणाऱ्या काळात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दोघांची ताकद इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत एकवटली, तर विरोधकांना चांगले दिवस येतील. परंतु शहरातील गट नेत्यांच्यातच अंतर्गत मतभेद असल्याने विरोधकांकडे ताकद असूनही त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही.