शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जयंतरावांच्या ताकदीवरच नगराध्यक्ष ठरणार

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

सक्षम चेहऱ्याचा शोध : विरोधकांकडे मात्र प्रभावी नेत्याचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी पाच वर्षांसाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कोणतेही आरक्षण पडले, तरी सत्ताधाऱ्यांकडे एकही नेता असा नाही, की तो स्वबळावर नगराध्यक्षपद मिळवू शकतो. ज्याच्या डोक्यावर आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त असेल, तोच भावी नगराध्यक्ष ठरणार आहे. याउलट विरोधी गटाचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी, विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याने जनेततून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांची ताकद विरोधकांच्या पाठीशी होती. त्यामुळेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात आनंदराव मलगुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. आता हे दोघेही जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. या दोघांनाही आता नगराध्यक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. जर नगराध्यक्ष पदासाठी ओ. बी. सी. आरक्षण पडले, तर आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे आणि संजय कोरे यांचा विचार राष्ट्रवादीतून होऊ शकतो.खुल्या पुरुष गटासाठी आतापासूनच विजयभाऊ पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु विजय पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी चालणारच नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात त्यांचेच काही हितचिंतक करू लागले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील हे पक्षाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. अन्यथा ते स्वत:च्या प्रभागात काय आरक्षण पडते यावर लक्ष ठेवून आहेत. यावरुन त्यांची रणनीती ठरणार आहे. महिलांमधून माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचे नाव घेतले जाते. या नावाला विरोध करण्यासाठी कोणतीही महिला पुढे येण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत.नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचारही जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. याउलट विरोधी गटाची अवस्था दयनीय आहे. खा. राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांच्या नेत्यांचे मनोमीलन झाले तरीही अंतिम टप्प्यात वादाला तोंड फुटते, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एल. एन. शहा यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना विरोधकांची कितपत साथ मिळेल, यावरच सर्वकाही अवलंबून आहे....तर विरोधकांना चांगले दिवस येतील येणाऱ्या काळात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दोघांची ताकद इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत एकवटली, तर विरोधकांना चांगले दिवस येतील. परंतु शहरातील गट नेत्यांच्यातच अंतर्गत मतभेद असल्याने विरोधकांकडे ताकद असूनही त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही.