शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

हौसाताईंच्या निधनाने चळवळीचे प्रेरणस्थान हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

हौसाताईंच्या निधनाने मोठा आधार हरवला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची आयुष्याची वाटचाल केली. क्रांतिसिंहांच्या लढ्यात ...

हौसाताईंच्या निधनाने मोठा आधार हरवला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची आयुष्याची वाटचाल केली. क्रांतिसिंहांच्या लढ्यात हिरिरीने सहभागी झाल्या. त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे. क्रांतिविरांगना या उपाधीला शोभेसे त्यांचे आयुष्य होते.

- माधवराव माने, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

वयाच्या नव्वदीतही हौसाताईंचे विचार क्रांतिकारी राहिले. वृद्धापकाळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या उपोषणात सहभागी झाल्या होत्या. तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गोव्यातून शस्त्रे आणण्यासाठी त्यांनी खाडीतून तराफ्यावरून धाडसाने प्रवास केला होता. तीच धडाडी व धाडस अखेरपर्यंत कायम राहिले. बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सक्रिय सहभागी राहिल्या. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधार हरवला आहे.

- प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत

हौसाताई म्हणजे चळवळींचे प्रेरणास्थान होत्या. त्यांची इच्छाशक्ती अखेरपर्यंत कायम होती. त्यांच्या छायेखालीच आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते वाढले. कितीही निराशेची स्थिती आली तरी त्याला दोन हात करण्याची ताकद हौसाताईंनी वेळोवेळी दिली. त्यांच्या प्रेरणेने अनेक चळवळी उभ्या राहिल्या. सध्याच्या निराशेच्या काळात त्यांच्या जाण्याने चळवळींचा महत्त्वाचा धागा खंडित झाला आहे.

- संपतराव पवार, पाणी चळवळीतील अग्रणी

क्रांतिसिंहांच्या विचारांना साजेसे जीवन हौसाताई शेवटपर्यंत जगल्या. क्रांतिकारकाची मुलगी कशी असावी याचे त्या नेमके उदाहरण होत्या. दुष्काळी भागात असूनही चळवळीचा गाडा त्यांनी सांभाळला. समन्यायी पाणी वाटपासाठी सतत रस्त्यावर राहिल्या. बळीराजा धरणाप्रमाणेच क्रांतिसिंहांच्या नावानेही हणमंतवडिये येथे धरण बांधण्याचे नियोजन त्यांच्या जाण्याने अधुरे राहिले. स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा धागा निखळला आहे.

- धनाजी गुरव, विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते

स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित शेवटचा दुवा हौसाताईंच्या निधनाने निखळला आहे. देशासाठी आणि समाजासाठी त्यांचे काम अमूल्य असेच आहे. त्यांच्या विचारांनुसार वाटचाल करणे हीच श्रद्धांजली ठरेल.

- वैधव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा संकुल

आई विजयाताई लाड आणि हौसाताई या दोघीही आमचे प्रेरणास्थान होत्या. हौसाताईंना भेटने त्यावेळी त्यांच्याकडून आईचे प्रेम मिळायचे. जीडी बापूंचा पराक्रम नेहमी सांगायच्या. शेतकऱ्यांसाठी लढण्याची त्यांची ऊर्जा अखेरपर्यंत कायम होती. शिक्षण कमी असले तरी व्यवहारज्ञान अफाट होते. त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असेल.

- अरुण लाड, आमदार

हौसाताई लढाऊ महिला होत्या. अखेरच्या क्षणापर्यंत चळवळीशी नाते कायम राखले. त्यांच्या निधनाने प्रेरणास्थान हरवले आहे.

- प्रा. शरद पाटील, माजी आमदार