शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कापसाची हानी, अहवालाची रडगाणी

By admin | Updated: June 17, 2015 00:41 IST

आटपाडीतील शेतकऱ्यांवर अन्याय : कापूस नुकसानीची पाहणी होणार कधी? कृषी विभाग सुस्तच

अविनाश बाड -आटपाडी --शेतकऱ्यांनी बियाणांच्या भेसळीबाबत अथवा बोगसगिरीबाबत तक्रार केल्यानंतर सात दिवसांच्या आत तक्रार निवारण समितीने शेतीला भेट देऊन अहवाल देण्याचा शासनाचा आदेश कृषी विभागानेच आटपाडीत धाब्यावर बसविला आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कापूस पैदास केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. भारूड यांचे आज नाही, उद्या येतो, असे पालुपद सुरूच आहे. ते न आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.आटपाडी तालुक्यात यंदा उन्हाळी हंगामातील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रातील कापसाची लागवड वाया गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषिधन आणि ग्रीनगोल्ड या कंपनीचे कापसाचे बी. टी. कॉटन वाणाचे बियाणे वापरले, त्या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे पीक वाढले नाही. त्याला फुले आणि बोंडे लागलेली नाहीत. याआधी २००८ मध्ये कापसाच्या बियाणाबाबत अशाच तक्रारी झाल्या होत्या. वारंवार अशा प्रसंगांना आणि मोठ्या आर्थिक फटक्याला तालुक्यातील शेतकरी सामोरे जात असताना कृषी विभाग याबाबत कसलीही भूमिका घेताना दिसून येत नाही. दि. १५ जूनरोजी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ येणार म्हणून कंपन्यांचे अधिकारीही आले, पण आज मंगळवारीही ते आले नाहीत. बियाणे बोगस असल्याबाबत लेखी तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे वरलक्ष्मी आणि येलार या जातीच्या वाणाच्या कापसाची वाढ चांगली झाली आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन पुढील कार्यवाही तात्काळ करण्यासाठी शासनाने तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात, तर तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीजचा प्रतिनिधी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात. तक्रारी प्राप्त होताच ७ दिवसात त्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट द्यावी आणि कृषी विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी तांत्रिकदृष्ट्या योग्य अहवाल द्यावा, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र प्रत्यक्षात इथे शेतकऱ्यांनी तक्रारी देऊन १५ दिवस होत आले, तरी कृषी शास्त्रज्ञ इकडे फिरकलेसुद्धा नाहीत. तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. कापसाच्या पिकातून केलेला खर्चही कोणत्याही शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही. हे पीक काढून टाकून त्या ठिकाणी खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. आणखी काही दिवस वाट पाहिली, तर ओल उडून गेली तर खरीप हंगाम पेरणीही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कापसाचे पीक वाया गेल्याने काही आर्थिक मदत मिळेल. काही अंशाने का होईना पण नुकसानभरपाई मिळेल, या आशेने शेतकरी कृषी शास्त्रज्ञांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. आले शास्त्रज्ञांच्या मना...कृषी विभागाने तक्रारी येताच प्रथम कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रास संपर्क साधून तज्ज्ञ पाठविण्याची विनंती केली. ४ दिवसांनी त्यांनी आमच्याकडे कापूस पिकाचा तज्ज्ञ नसल्याचे कळविले. यामुळे कृषी विभागाने राहुरीला कृषी विद्यापीठात संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या विद्यापीठातील प्रशासनाने दादच दिली नाही. आमदार अनिल बाबर यांनी संपर्क साधला, प्रयत्न केले, तेव्हा त्यांनी दि. १५ जून रोजी डॉ. भारूड यांना पाठविणार, असे सांगितले. प्रत्यक्षात ते मंगळवारीही आलेले नाहीत आणि नेमके कधी येतील, हेही अनिश्चित असल्याचे सांगण्यात आले.