शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

शासनाने केले हात वर, उपयोगकर्ता कर राहणार डोईवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST

सांगली : व्यापारी, नागरिकांच्या संतापाचे कारण बनलेल्या महापालिकेच्या उपयोगकर्ता कराचे ओझे हटविण्याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार देत हात ...

सांगली : व्यापारी, नागरिकांच्या संतापाचे कारण बनलेल्या महापालिकेच्या उपयोगकर्ता कराचे ओझे हटविण्याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार देत हात वर केले. राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षांचे स्थानिक नेते व विरोधी भाजपची महापालिकेतील सत्तास्थानामुळे गोची झाली आहे. या सर्वांना एकाच वेळी जनतेचा रोष स्वीकारावा लागणार आहे. या कराने व्यापारी, नागरिकांनाच नव्हे तर राजकीय पक्षांनाही हैराण केले आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त केला. महापालिकेने उपयोगकर्ता कर लागू केल्याने नगरसेवकांना शिव्या खाव्या लागत आहेत. हा कर रद्द होणार नसेल, तर तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार घरपट्टीच्या तुलनेत उपयोगकर्ता कर कमी करून शासनाला पाठविण्याचा ठराव करण्यात आला.

या कराविरोधात व्यापारी, फेरीवाल्यांसह नागरिकांचे मोर्चे निघत आहेत. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर यांनीही नुकताच या प्रश्नी मोर्चा काढला होता. शिवसेनाही याविरोधात असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांचेच नेते असलेले नगरविकास मंत्री शिंदे यांनी हा कर रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, पालकमंत्री जयंत पाटील हे राज्यातील ज्येष्ठ मंत्री असूनही त्यांनाही या कराचा भार हलका करता आला नाही. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्र्यांना दिले होते. तिन्ही पक्ष सत्तेत असूनही त्यांच्या विरोधाची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे हा कर आता डोईवरून हटणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिक, व्यापारी, विक्रेते यांच्या संतापाचा अग्नी भडकला आहे. त्यांच्या नाराजीचा सामना करण्याची इच्छा कोणाचीही नाही. सध्या महालिकेत सत्तास्थानी भाजप असल्यामुळे त्यांचीही कोंडी झाली आहे.

चौकट

नगरपालिका बरी होती...

उत्पन्नवाढीचा विचार करून तत्कालीन म्युनिसिपालटीने १९३१ मध्ये ‘टर्मिनल टॅक्स’ अमलात आणला होता. नगरपरिषदेच्या हद्दीतून जाणाऱ्या व येणाऱ्या मालावर दर बंगाली मणास सहा पै प्रमाणे कर बसविण्याची शिफारस केली होती. या संदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केल्यानंतर तक्रारींची दखल घेऊन या करात बदल केला होता. इतकी दखल आता महापालिकेत घेतली जात नसल्याने नगरपालिका बरी होती, असे लोक म्हणत आहेत.