शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

तीन हजार दरासाठी निम्मे कारखानदार तयार

By admin | Updated: October 18, 2016 23:07 IST

‘एफआरपी’पेक्षा जादा देणार : उसाचे क्षेत्र ३0 टक्क्यांनी घटल्याचा परिणाम; उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’

सांगली : मागील वर्षातील दुष्काळ, लोकरी मावा आणि हुमणी किडीमुळे जिल्ह्यातील उसाचे ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदा उसाची पळवापळवी होणार आहे. शिवाय साखरेचे दर तीन हजारावर गेल्याने कारखानदारांनी ऊस खेचून नेण्यासाठी उसाला तीन हजारापर्यंत दर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे उसाच्या दरासाठी संघटनांना आक्रमक आंदोलन करावे लागणार नाही, असे चित्र आहे.सांगली जिल्ह्यात ६९ हजार ७०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. मागील दोन वर्षात ८५ हजार हेक्टर ऊस गळितासाठी उपलब्ध झाला होता. शिवाय, दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील साखर कारखान्यांना कर्नाटक सीमाभाग आणि सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उपलब्ध झाला होता. यावर्षी जिल्ह्यात दहा हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे गळीत हंगामासाठी जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांना ७२ हजार टन ऊस उपलब्ध होणार आहे. सोलापूरमध्ये कारखान्यांची संख्या वाढली आहे. येथील कारखाने सांगली जिल्ह्यातील ऊस पळवू लागले आहेत. कर्नाटक सीमाभागातही कारखान्यांची संख्या वाढली असून, त्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी काट्यावर प्रतिटन २२०० ते २३०० रुपये दर देऊन ऊसतोडी सुरू केल्या आहेत. याचा विचार केल्यास सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याआधीच आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यातील साखर कारखानदारांनी तीन हजार रुपये अंतिम बिल देऊन ऊस उचलण्याची तयारी दर्शविली आहे. वाळवा तालुक्यातील काही कारखान्यांनी तीन हजाराचे अंतिम बिल देणारच असल्याचे सांगत उसाची नोंदणी सुरू केली आहे. साखरेचे दर ३१०० रुपयांच्या पुढे राहिल्यास ऊस उत्पादकांना निश्चित चांगला दर मिळेल, अशी जुजबी प्रतिक्रिया साखर कारखानदारांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी ऊस दराबाबतची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच कारखानदारांकडून दराची घोषणा होणार आहे. सर्वच कारखानदारांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दि. २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. या परिषदेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी ऊस दराबरोबरच साखर कारखान्यांचे वजन-काटे आणि साखर उतारा कमी दाखविण्याचा मुद्दा गाजणार आहे. अनेक साखर कारखानदार एफआरपी कमी बसावी, म्हणून उतारा कमी दाखवत आहेत. या प्रश्नाकडेही आता संघटनांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.(प्रतिनिधी)साडेतीन हजार दर हवा : रघुनाथदादा साखरेचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांपर्यंत आहेत. भविष्यातही दर स्थिर राहणार आहेत. शिवाय बगॅस, मोलॅसीसचे दरही चढे आहेत. यामुळे ऊस उत्पादकांना साखर कारखानदार प्रतिटन तीन हजार रुपये दर निश्चित देतीलच. मात्र या दरावर आम्ही गप्प बसणार नाही. कारखानदारांनी पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपये दिली पाहिजे. उर्वरित रक्कम अन्य उत्पादनांची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. उसाला पाच हजार रुपये दर मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.