शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरे सुरू

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

शेतकऱ्यांना दराची चिंता : व्यापाऱ्यांनी दर पाडल्यास उद्योग धोक्यात

सहदेव खोत -- पुनवत--प्रतिवर्षीप्रमाणे शिराळा तालुक्यात कणदूरसह अनेक ठिकाणी गुऱ्हाळघरातील गळिताला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची सुरुवातीपासूनच गूळदरावर नजर राहणार असून, गूळ व्यापाऱ्यांनी दराबाबत जर शेतकऱ्यांची गळपेची केली, तर गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात येणार, असे बोलले जात आहे.शिराळा तालुक्यात प्रतिवर्षी दिवाळीदरम्यान वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या चिमण्या पेटतात. वारणा पट्ट्यातील या गुऱ्हाळांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. किमान चार महिने तरी अनेकांना या उद्योगातून रोजगार मिळत असल्याने, गुऱ्हाळ उद्योग हे अनेकांचे अर्थार्जनाचे साधन बनले आहे. मात्र प्रतिवर्षी गुऱ्हाळघरांची घटणारी संख्या, ही या उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.यावर्षी तालुक्यात नुकताच गुऱ्हाळांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी, यासाठी कामगार मिळविणे ते टिकवून ठेवणे, उद्योग चालविण्यासाठी गळिताचे योग्य भाडे ठरविणे, शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य भाव मिळवून देणे अशी आव्हाने गुऱ्हाळ मालकांसमोर आहेत. तसेच गुऱ्हाळात ऊस गळीत करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दर मिळविणे, शिवाय गळीत भाडे, तोडणी, खते, मजुरीवरील खर्च वजा करता, काहीतरी पदरात पडावे, ही अपेक्षा आहे.तालुक्यातील विश्वास, शिवाजी केन, दालमिया व उदय (बांबवडे, ता. शाहुवाडी) या कारखान्यांच्या स्पर्धेतून गुऱ्हाळघरांना ऊस मिळविणे गुऱ्हाळ मालकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यातच साखर कारखान्यांच्या उद्योग दराचे गणित जर विस्कटले, तर शेतकरी गुऱ्हाळांकडे पाठ फिरविणार आहेत. दराचा गुऱ्हाळांना फटका कोल्हापूर व कऱ्हाडच्या बाजारपेठेत गूळ व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रति क्ंिवटल चार हजारावर दर न दिल्यास, शेतकरी गुऱ्हाळ उद्योगापासून परावृत्त होण्याची चिन्हे आहेत. याचा फटका गुऱ्हाळ चालकांना बसण्याची शक्यता गुऱ्हाळ चालकांनी व्यक्त केली आहे.तालुक्यातील गुऱ्हाळे २५सुमारे ७०० जणांना रोजगारआदनाचा गळीत खर्च २००० रुपयांच्या घरातसरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल इरादादर पाडल्यास उद्योग अडचणीत