शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

ग्रामपंचायतींचे घोटाळे ‘पीआरसी’च्या दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:02 IST

अहवालच गायब : पाठीराख्यांचीही होणार गोची

सांगली : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे दहा ते पंधरा वर्षात लेखापरीक्षणच झाले नसून, काही ठिकाणी ग्रामसेवकांनी दफ्तरच गायब केले आहे. यामुळे घोटाळ्यांचा पुढे तपास होत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याची सर्व माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे (पीआरसी) दिली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीआरसी समिती येणार असल्यामुळे ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केल्यानंतर चारशे ग्रामपंचायतींमध्ये तीन कोटींचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार १९८९ ते २००१ या काळातील असून, पंचवीस वर्षांत दोषी ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर जुजबी कारवाई झाली आहे. याशिवाय, चाळीस ग्रामपंचायतींमध्ये ४० लाख १४ हजार ९४२ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता़ यापैकी माळवाडी (ता़ पलूस), आटपाडी तालुक्यातील उंबरगाव, विठलापूर, शिराळा तालुक्यातील मणदूर, कडेगाव तालुक्यातील तडसर, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, चोरोची आणि वाळवा तालुक्यातील वाळवा आदी ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांनी १२ लाख ४३ हजार ५७२ रुपये जिल्हा परिषदेकडे भरले आहेत़ उर्वरित १७ ग्रामपंचायतींमधील आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी घोटाळ्यातील २७ लाख ७१ हजार ३७० रुपये जिल्हा परिषदेकडे भरलेले नाहीत़ पलूस, मिरज, जत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये लेखापरीक्षणासाठी दफ्तरच उपलब्ध नसल्याचा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. येथील घोटाळ्याचे आकडे कोटीपर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. ग्रामपंचायतीमधील या घोटाळ्याची पुराव्यांसह एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे. समितीनेही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, जुलैमध्ये ही समिती जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. यावेळी घोटाळ्यातील संबंधित ग्रामपंचायतींची ते पाहणी करणार असल्याचे समजते. पाणी योजना, रोजगार हमीची कामे, वित्त आयोग आदींचा निधीही थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. यामुळे या निधीतून काही ग्रामपंचायतींमध्ये चांगली विकास कामे झाली आहेत. पण, काही गावात वर्षानुवर्षे त्याच त्या गटाची सत्ता आहे. त्यांच्याकडून कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवकांना हाताशी धरूनच घोटाळा केला आहे. काही गावात तर लोकप्रतिनिधींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आठवडा बाजारातील कर, घरपट्टी, पाणीपट्टीच्या पैशावर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)