शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे घोटाळे ‘पीआरसी’च्या दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:02 IST

अहवालच गायब : पाठीराख्यांचीही होणार गोची

सांगली : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे दहा ते पंधरा वर्षात लेखापरीक्षणच झाले नसून, काही ठिकाणी ग्रामसेवकांनी दफ्तरच गायब केले आहे. यामुळे घोटाळ्यांचा पुढे तपास होत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याची सर्व माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे (पीआरसी) दिली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीआरसी समिती येणार असल्यामुळे ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केल्यानंतर चारशे ग्रामपंचायतींमध्ये तीन कोटींचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार १९८९ ते २००१ या काळातील असून, पंचवीस वर्षांत दोषी ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर जुजबी कारवाई झाली आहे. याशिवाय, चाळीस ग्रामपंचायतींमध्ये ४० लाख १४ हजार ९४२ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता़ यापैकी माळवाडी (ता़ पलूस), आटपाडी तालुक्यातील उंबरगाव, विठलापूर, शिराळा तालुक्यातील मणदूर, कडेगाव तालुक्यातील तडसर, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, चोरोची आणि वाळवा तालुक्यातील वाळवा आदी ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांनी १२ लाख ४३ हजार ५७२ रुपये जिल्हा परिषदेकडे भरले आहेत़ उर्वरित १७ ग्रामपंचायतींमधील आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी घोटाळ्यातील २७ लाख ७१ हजार ३७० रुपये जिल्हा परिषदेकडे भरलेले नाहीत़ पलूस, मिरज, जत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये लेखापरीक्षणासाठी दफ्तरच उपलब्ध नसल्याचा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. येथील घोटाळ्याचे आकडे कोटीपर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. ग्रामपंचायतीमधील या घोटाळ्याची पुराव्यांसह एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे. समितीनेही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, जुलैमध्ये ही समिती जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. यावेळी घोटाळ्यातील संबंधित ग्रामपंचायतींची ते पाहणी करणार असल्याचे समजते. पाणी योजना, रोजगार हमीची कामे, वित्त आयोग आदींचा निधीही थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. यामुळे या निधीतून काही ग्रामपंचायतींमध्ये चांगली विकास कामे झाली आहेत. पण, काही गावात वर्षानुवर्षे त्याच त्या गटाची सत्ता आहे. त्यांच्याकडून कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवकांना हाताशी धरूनच घोटाळा केला आहे. काही गावात तर लोकप्रतिनिधींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आठवडा बाजारातील कर, घरपट्टी, पाणीपट्टीच्या पैशावर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)