शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

‘कडेगाव’मधील दहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

आरक्षण जाहीर : पतंगराव कदम-पृथ्वीराज देशमुख गट आमनेसामने

कडेगाव : तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुका यावेळी काँग्रेस विरुध्द भाजप अशा रंगणार असून, यामध्ये कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.सांगली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जुलै, डिसेंबरअखेर संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून, कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या कडेगाव तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर कडेगाव ग्रामपंचायतीवर १७ पैकी १३ सदस्य सध्या काँग्रेसचे आहेत. त्यामुळे कडेगाववर सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. तशा प्रकारच्या हालचाली सध्या सुरु आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा कडेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापणार आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम यांच्याविरोधात तुल्यबळ लढत दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे कडेगावची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरणार आहे. यापूर्वी सतत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र येऊन सत्तेत भागीदारी मिळवत असत. यावेळी असे काही घडणार नाही. राष्ट्रवादीला या निवडणुकीत फारसे काही हाती लागणार नाही, कारण राष्ट्रवादीकडे तुल्यबळ असा नेता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीनिमित्त माजी आमदार देशमुख व पतंगराव कदम गट आमने-सामने उभे राहणार आहेत. साहजिकच ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरणार आहे.त्यासाठी सध्या दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. शाळगाव परिसरातील ढाणेवाडी, कान्हरवाडी, येतगाव, कोतीजच्या निवडणुका विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण शाळगावच्या नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. सोनहिरा खोऱ्यात रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, येथे भाजपचा कस लागणार आहे. (वार्ताहर)कडेगावसाठी जोरदार लढतरामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असली तरी, भाजपही वर्चस्वासाठी जोरदार प्रयत्न करेल.