शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

ग्रामपंचायत मैदानात वर्चस्वाची दावेदारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागावर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच मोठ्या पक्षांची धडपड सध्या सुरू आहे. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षीय वर्चस्वाचा डंकाही पिटला जाणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्टÑवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांची ताकद पणाला लावली असून प्रत्येकाने जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकण्याचा दावा केला आहे.गेल्या दोन वर्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागावर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच मोठ्या पक्षांची धडपड सध्या सुरू आहे. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षीय वर्चस्वाचा डंकाही पिटला जाणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्टÑवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांची ताकद पणाला लावली असून प्रत्येकाने जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकण्याचा दावा केला आहे.गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दलची नाराजी ग्रामीण भागातील लोकांमध्ये विशेषत: शेतकºयांमध्ये दिसत आहे. शेतकºयांच्या कर्जमाफी योजनेचा गोंधळही या नाराजीत भर टाकत आहे. अनेक अडचणीतून जिल्ह्यातील शेतकरी प्रवास करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून संवाद साधत असताना शेतकºयांमधून तसेच ग्रामीण जनतेतून नाराजी स्पष्टपणे जाणवत आहे. तरीही केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण न करता, आम्ही गावांच्या विकासाची भूमिका मांडून लोकांसमोर जात आहोत. लोकांनाही काँग्रेसची ही भूमिका पटत आहे. ज्याठिकाणी गावाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित होऊन तडजोडीने बिनविरोध निवडणूक करण्याचा विचार पुढे येत आहे, त्याठिकाणी काँग्रेस बिनविरोधसाठी तयार आहे. लोकांच्या प्रश्नांशी एकरुप होऊन ते सोडविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आमचा पक्ष करणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आम्ही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी समन्वय राखून काम करीत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला व सक्षम उमेदवार निवडताना त्याठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मताचा कानोसाही घेतला जात आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमचे नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागात आजही काँग्रेसची ताकद कायम आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पक्षाकडे आहे. त्यामुळे याच ताकदीच्या बळावर आणि विकासाच्या भूमिकेवर आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकून दाखवू. पक्षाचे सर्वच नेते यासाठी आता राबत आहेत. तालुकानिहाय किंवा गावनिहाय प्रतिस्पर्धी पक्ष व गट बदलत जातात. त्यामुळे आम्ही जिल्ह्यासाठी एकच धोरण न ठेवता, स्थानिक परिस्थितीवर अवलंबून नियोजन करीत आहोत.ग्रामीण भागातून भाजपबद्दल नाराजी- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेसगेल्या काही वर्षातील भाजपचा आलेख सातत्याने वर जाणारा आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीपासून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत जनतेने भाजपवरच सर्वात जास्त विश्वास व्यक्त करीत सत्तास्थाने दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील ताकद सिद्ध केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीही आमची तयारी सुरू आहे. गावपातळीवर स्थानिक परिस्थितीनुसार आघाड्या होणार असल्या तरी, भाजपच्या विचाराचे लोक प्रत्येक ठिकाणी असतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर नियोजन केले जात आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमधील आमचा समन्वय चांगला आहे. भाजपबद्दल लोकांमध्ये चांगली भावना आहे. केंद्र व राज्यातील सत्तेनंतर आजअखेर अनेक लोकोपयोगी निर्णय आम्ही घेतलेले आहेत. यामध्ये कर्जमाफीचा निर्णय सर्वात महत्त्वाचा आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याचे काम सरकार करीत आहे. यापुढेही अशाच लोकोपयोगी व विकासात्मक कारभारासाठी ग्रामपंचायतींच्याही सत्तास्थानी भाजप असेल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. निश्चितपणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील. सरपंच पदांच्या शर्यतीतही आमचा पक्ष बाजी मारणार आहे. स्थानिक पातळीवर अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. येतील त्या सर्व चांगल्या लोकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. पक्षाची व्याप्ती वाढविताना आम्ही विकासाचे धोरण तेच ठेवले आहे. पक्षांतर्गत कुठेही वाद नाहीत. स्थानिक पातळीवर जर कुठे वाद निर्माण होत असतील, तर ते समन्वयाने मिटविण्याची जबाबदारी तालुका अध्यक्षांना दिली आहे.ग्रामपंचायतींवरही भाजपचेच वर्चस्व राहणार- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप