शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सरकारनामा----- तंबूत शिरलेल्या उंटांची गोष्ट

By admin | Updated: September 18, 2014 23:26 IST

अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं ‘कमळ’ गोठवून अपक्षाला पाठिंबा दिला. भाजपची फरफट झाली. तंबू केव्हाच पळवला गेला होता!

संभाजीआप्पा पवारांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा काही भाजपेयींनी नाकं मुरडली होती, पण आप्पांची बैठक सांगलीच्या गावभागातच असल्यानं ते पक्षात विरघळून गेले. हळूहळू भाजपचा तंबू त्यांनी मारुती चौकात आणला. पुढं जयंतरावांच्या इशाऱ्यावर त्यांनी भाजपला महापालिका, बाजार समितीत खेळवलं. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं ‘कमळ’ गोठवून अपक्षाला पाठिंबा दिला. भाजपची फरफट झाली. तंबू केव्हाच पळवला गेला होता!यंदा संजयकाका पाटील यांच्या भाजपप्रवेशावेळी आप्पांना तीच भीती होती. आधीच दोघांच्या तालमीचं विळ्या-भोपळ्याचं सख्य, त्यात काका कधी तंबू उचलून नेतील, याचा नेम नाही, त्यामुळं आप्पांनी कडाडून विरोध केला. आप्पांसोबत पक्षातील जुन्या-नव्या (मोडीत निघालेल्या) मंडळींनीही हात-पाय घासले, पण काकांनी तंबूत घुसून खासदारकी मिळवली. आता भाजपचा तंबू काकांच्या इशाऱ्यावर हलायला लागलाय. ज्यांनी काकांना ‘बाहेरचा’ म्हणून हिणवलं, काकांना तिकीट मिळणार नाही, अशी आवई उठवली, तीच मंडळी (संभाजीआप्पा सोडून हं! इतरांची नावं घ्यायलाच हवीत का..?) विजयाचा गुलाल लावून घ्यायला पुढं होती. आता त्या सगळ्यांनाच काकांचा हिसका कळून चुकलाय. हळूहळू काँग्रेस-राष्ट्रवादीतील इतर राहुट्याही या तंबूत यायला लागल्यात. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पसाराच मोठा. नानाविध संस्थांचं जाळं, सत्तेची ऊब आणि कडव्या कार्यकर्त्यांचा जाळ या जोरावर त्यांच्या राहुट्या मजबूत झाल्यात. गावा-गावांपर्यंत पोहोचल्यात. त्यामुळं मोदी लाट येईपर्यंत केवळ नागर संस्कृतीशी मिळतं-जुळतं घेणाऱ्या भाजपेयींची ताकद त्यांच्यापुढं जेमतेमच राहिली. अर्थात जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतरही मूळ भाजपेयींचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ वाढलेलं नाही. परिणामी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयातीवर भरवसा ठेवावा लागतोय. (भाजपवाल्यांचा आव मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूंचे कळस कापून आणल्याचा!) लाटेवर आमदारकी मिळवण्यासाठी तिथले कळस स्वत:च कापून घेऊन येणाऱ्यांना आता थांबवताही येईना! संजयकाकांचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, दुष्काळी फोरम ते भाजप असा, अजितराव घोरपडे अपक्ष, विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी मजल-दरमजल करत ‘कमळा’कडं आलेले, धनपाल खोत आधी काँग्रेसमधील प्रकाशबापू गट, नंतर मदन पाटील गट, राष्ट्रवादी, कुपवाड विकास आघाडी अशा सत्तेच्या गाड्या बदलत भाजपवासी झालेले, पप्पू डोंगरेंचे तेच, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, दिनकरतात्या, श्रीनिवास पाटील वगैरे कुंपणावरच्या मंडळींची वाटचालही अशीच. ‘विधानसभेचं तिकीट’ हे भाजपप्रवेशाचं मुख्य कारण असलं तरी इतर कारणं व्यक्तिसापेक्ष बदलणारी. आता एवढ्या तयार राहुट्या भाजपच्या तंबूत येत असल्यानं तंबूतले आधीचे-मूळचे लोक कानकोंडे होऊन कोपरे धरून बसलेत, तर काहींनी पुढं-पुढं करत आपणच सगळं घडवून आणल्याचा आव आणलाय. तंबूत येणारी नवी मंडळी वरचढ होणार असल्याचं दिसू लागताच काहींनी सोशीकता दाखवत हातमिळवणी केलीय. ‘सांगता येईना आणि सहनही होईना’, ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशा म्हणी-वाक्प्रचारांचे शब्दार्थ, भावार्थ, व्यंग्यार्थ त्यांना पुरेपूर कळून चुकलेत. जसं देशभरात, तसं सांगलीत. तंबूत शिरलेल्या आणि तंबूच पळवून नेणाऱ्या उंटाची गोष्ट त्यांना ठाऊक आहे, पण करणार काय...?- श्रीनिवास नागे