शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शासन आरटीईचे पैसे देईना, फुकट किती दिवस शिकवायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

सांगली : वर्षभर विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवायचे आणि शासनाकडून त्याच्या आर्थिक परताव्यासाठी दोन-तीन वर्षे वाट पहायची, असा आर्थिक कोंडीचा अनुभव ...

सांगली : वर्षभर विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवायचे आणि शासनाकडून त्याच्या आर्थिक परताव्यासाठी दोन-तीन वर्षे वाट पहायची, असा आर्थिक कोंडीचा अनुभव शिक्षण संस्थाचालक घेत आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत गेल्या दोन शैक्षणिक वर्षांचे परतावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी संस्थाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे.

२०१४ मध्ये शिक्षणाचा हक्क कायादा लागू झाला. शाळेतील २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सरकारकडून त्यांचे शिक्षण शुल्क परताव्याच्या स्वरूपात दिले जाते. आजवर एकदाही ते वेळेत मिळालेले नाहीत. २०१६-१७, १७-१८ व १८-१९ या तीन शैक्षणिक वर्षांचे परतावे प्रलंबित होेते. ते मिळण्यासाठी शिक्षणसंस्थांचा पाठपुरावा सुरू होता; पण शासन दाद देत नव्हते. गेल्या कोरोनाकाळात संस्थांचे अर्थचक्र ठप्प झाल्यानंतर संस्थाचालकांनी पुन्हा एकदा जोर लावला. त्यानंतर शासनाला जाग आली. तीनही वर्षांचे कोट्यवधींचे परतावे गेल्या तीन-चार महिन्यांत एकदम देण्यात आले.

सध्या २०१९-२० व २०-२१ या दोन वर्षांचे परतावे प्रलंबित आहेत. त्यांचे प्रस्तावदेखील अद्याप शासनाने मागवलेले नाहीत. परताव्यासाठी पुन्हा पिच्छा पुरवावा लागणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा तर अद्याप विचारही दिसत नाही.

चौकट

२०१७-१८ मध्ये ४३ लाख मिळाले

शासनाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या परताव्यासाठी ३६ लाख सहा हजार रुपये मंजूर केले होते. कोषागारातून ३४ लाख पाच हजार रुपये मिळाले. प्रत्यक्ष शिक्षणसंस्थांना ४३ लाख ५७ हजार २९० रुपये अदा करण्यात आले. त्यापूर्वीच्या शिल्लक अनुदानातून जादा पैसे देण्यात आले. अर्थात ही रक्कम मागणीच्या ८० टक्के इतकीच आहे. अद्याप २० टक्के परतावा मिळणे बाकी आहे.

चौकट

२०१८-१९ मध्ये २१ लाख मिळाले

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात वीस लाखांची तरतूद झाली. परताव्यापोटी २१ लाख ४२ हजार ७६० रुपये देण्यात आले. त्यासाठीदेखील गतवर्षीच्या शिलकेतून जादा पैशांची तजवीज करण्यात आली. हा परतावा नोंदणीच्या ९० टक्केच आहे. १० टक्के अद्याप यायचा आहे.

चौकट

२०१९-२० या वर्षात छदामही नाही

२०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी परतावा अजूनही मिळालेला नाही. किंबहुना त्याचे प्रस्तावदेखील शासनाने अद्याप मागविलेले नाहीत. ही रक्कमदेखील सुमारे ३० लाखांहून अधिक आहे. सध्या कोरोनामुळे शासनाची आर्थिक स्थिती ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर परतावे मिळण्यासाठी संस्थांना मोठाच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

पॉइंटर्स

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत नोंदणीकृत शाळा- २२६

आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश

२०१७-१८ : ७१५

२०१८-१९ : ७४५

२०१९-२० : ७६८

कोट

कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात निधी शाळांना देण्यात आला. मोहीम राबवून प्रस्ताव निकाली काढण्यात आले. दोन-तीन वर्षांचे प्रलंबित परतावे शिक्षणसंस्थांना दिले. शासनाकडून निधी मिळेल त्याप्रमाणे परतावा दिला जातो.

- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

---------