शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शासन आरटीईचे पैसे देईना, फुकट किती दिवस शिकवायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST

सांगली : वर्षभर विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवायचे आणि शासनाकडून त्याच्या आर्थिक परताव्यासाठी दोन-तीन वर्षे वाट पहायची, असा आर्थिक कोंडीचा अनुभव ...

सांगली : वर्षभर विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवायचे आणि शासनाकडून त्याच्या आर्थिक परताव्यासाठी दोन-तीन वर्षे वाट पहायची, असा आर्थिक कोंडीचा अनुभव शिक्षण संस्थाचालक घेत आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत गेल्या दोन शैक्षणिक वर्षांचे परतावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी संस्थाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे.

२०१४ मध्ये शिक्षणाचा हक्क कायादा लागू झाला. शाळेतील २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सरकारकडून त्यांचे शिक्षण शुल्क परताव्याच्या स्वरूपात दिले जाते. आजवर एकदाही ते वेळेत मिळालेले नाहीत. २०१६-१७, १७-१८ व १८-१९ या तीन शैक्षणिक वर्षांचे परतावे प्रलंबित होेते. ते मिळण्यासाठी शिक्षणसंस्थांचा पाठपुरावा सुरू होता; पण शासन दाद देत नव्हते. गेल्या कोरोनाकाळात संस्थांचे अर्थचक्र ठप्प झाल्यानंतर संस्थाचालकांनी पुन्हा एकदा जोर लावला. त्यानंतर शासनाला जाग आली. तीनही वर्षांचे कोट्यवधींचे परतावे गेल्या तीन-चार महिन्यांत एकदम देण्यात आले.

सध्या २०१९-२० व २०-२१ या दोन वर्षांचे परतावे प्रलंबित आहेत. त्यांचे प्रस्तावदेखील अद्याप शासनाने मागवलेले नाहीत. परताव्यासाठी पुन्हा पिच्छा पुरवावा लागणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा तर अद्याप विचारही दिसत नाही.

चौकट

२०१७-१८ मध्ये ४३ लाख मिळाले

शासनाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या परताव्यासाठी ३६ लाख सहा हजार रुपये मंजूर केले होते. कोषागारातून ३४ लाख पाच हजार रुपये मिळाले. प्रत्यक्ष शिक्षणसंस्थांना ४३ लाख ५७ हजार २९० रुपये अदा करण्यात आले. त्यापूर्वीच्या शिल्लक अनुदानातून जादा पैसे देण्यात आले. अर्थात ही रक्कम मागणीच्या ८० टक्के इतकीच आहे. अद्याप २० टक्के परतावा मिळणे बाकी आहे.

चौकट

२०१८-१९ मध्ये २१ लाख मिळाले

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात वीस लाखांची तरतूद झाली. परताव्यापोटी २१ लाख ४२ हजार ७६० रुपये देण्यात आले. त्यासाठीदेखील गतवर्षीच्या शिलकेतून जादा पैशांची तजवीज करण्यात आली. हा परतावा नोंदणीच्या ९० टक्केच आहे. १० टक्के अद्याप यायचा आहे.

चौकट

२०१९-२० या वर्षात छदामही नाही

२०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी परतावा अजूनही मिळालेला नाही. किंबहुना त्याचे प्रस्तावदेखील शासनाने अद्याप मागविलेले नाहीत. ही रक्कमदेखील सुमारे ३० लाखांहून अधिक आहे. सध्या कोरोनामुळे शासनाची आर्थिक स्थिती ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर परतावे मिळण्यासाठी संस्थांना मोठाच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

पॉइंटर्स

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत नोंदणीकृत शाळा- २२६

आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश

२०१७-१८ : ७१५

२०१८-१९ : ७४५

२०१९-२० : ७६८

कोट

कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात निधी शाळांना देण्यात आला. मोहीम राबवून प्रस्ताव निकाली काढण्यात आले. दोन-तीन वर्षांचे प्रलंबित परतावे शिक्षणसंस्थांना दिले. शासनाकडून निधी मिळेल त्याप्रमाणे परतावा दिला जातो.

- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

---------