शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शासनाचा वर्षभरातील कारभार निराशाजनक

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

पतंगराव कदम : दुष्काळप्रश्नी कोणतीही कृती नाही

कडेगाव : राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. वर्षभरातील शासनाचा कारभार अत्यंत निराशाजनक आहे. शासन जनतेला गृहीत धरून चालत नाही, हे कोल्हापूरच्या निकालावरुन शासनकर्त्यांना समजले असेल, अशी टीका माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत केली.कदम म्हणाले की, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन भाजपने मते मिळविली, परंतु दुष्काळप्रश्नी या शासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाबाबत शासन उदासीन आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजनांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. महागाई वाढली आहे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांच्या वाट्याचे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून उचललेच पाहिजे. नाही तर या योजनांच्या लाभक्षेत्रातील कायम दुष्काळी भागातील जनता कधीही माफ करणार नाही. म्हैसाळपासून जवळच कर्नाटकात कृष्णेचे पाणी जाते. यातील या तिन्ही योजनांच्या वाट्याचे पाणी दुष्काळात संबंधित लाभक्षेत्राला देणे शासनाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर आघाडी सरकारवर टीका केली होती. आघाडीच्या काळात बड्या मंत्र्यांच्या मतदार संघात भरघोस निधी दिला आणि अन्य मतदारसंघ वंचित राहिले, असे ते म्हणाले होते. याबाबत बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, शासनाचा निधी नियम व कायद्यानुसारच वापरावा लागतो आणि या नियम व कायद्यानुसारच विविध कामांसाठी निधी मिळविला होता. मुख्यमंत्र्यांनी खूप जबाबदारीने बोलण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. (वार्ताहर)