शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

गोटखिंडीचे ए. टी. पाटील तात्या : हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST

गोटखिंडी गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय आनंदराव तुकाराम पाटील तात्या तथा ए. टी. पाटील हे शांत संयमी, सुसंस्कृत, मनमिळाऊ, ...

गोटखिंडी गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय आनंदराव तुकाराम पाटील तात्या तथा ए. टी. पाटील हे शांत संयमी, सुसंस्कृत, मनमिळाऊ, तत्त्वनिष्ठ अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्म दि. १५ ऑक्टोबर १९४५ रोजी एका सधन कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच घरी वडिलांकडे गावचे सरपंचपद असल्याने तात्यांना राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयांचे बाळकडू मिळत गेले. त्यामुळेच गोटखिंडी गावच्या राजकारण, समाजकारणामध्ये गेली ५० वर्षे त्यांनी आपल्या कामाने व कर्तृत्वातून छाप पाडली. किंबहुना गोटखिंडी गावच्या राजकारणातील एक्का म्हणून संपूर्ण तालुकाभर त्यांची ख्याती होती.

तात्यांची गेली ५० वर्षाची राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कारकीर्द गावच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. तात्यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक क्षेत्रांतील वेगवेगळी मानाची पदे भूषवली. त्यामध्ये गोटखिंडी विद्यालयचे मुख्याध्यापक, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, गोटखिंडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक, वसंत पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक संचालक याबरोबरच अमृतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व मा. ना. जयंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था गोटखिंडी या संस्थांची स्थापना केली. अशा विविध संस्था व पदावर कामाच्या अनुभवाची दखल घेऊन ना. जयंत पाटील यांनी त्यांना आपल्या राजारामबापू पाटील इरिगेशन कमिटीचे अध्यक्षपदी संधी दिली. या व अशा विविध पदांवर अभ्यासू व जबाबदारीपूर्ण काम करण्याची पद्धती पाहून ना. जयंत पाटील यांनी तात्यांना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली.

राजकीय वाटचालीबरोबरच तात्यांचे गावच्या सर्वांगीण विकासाकडे तितकेच लक्ष होते. त्यातील एक उल्लेखनीय प्रसंग म्हणजे गोटखिंडी गावाची आर्थिक प्रगती करण्याचा रास्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून राजकारण, गट-तट विसरून गावामध्ये लिप्ट इरिगेशन आणण्याच्या कामामध्ये तात्या अग्रभागी होते. इरिगेशनचे बॉन्ड गोळा करण्यापासून ते कृष्णेचे पाणी गावात पडण्यापर्यंत आपली कामगिरी बजावली. राजकीय संस्थांच्या विविध पदावर काम करत असताना त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गावातील अनेक गरजूंना पेन्शन मिळवून दिल्या तसेच गरजूंना घरकुले, रेशनकार्ड आदी सुविधा मिळवून दिल्या. राजारामबापू पाटील उद्योग समूहामध्ये विविध पदांवर काम करत असताना तात्यांनी अनेक गरीब गरजू व हुशार युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळवून देण्याचे अतिशय मौलिक कार्य केले. हे कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा कोणाकडूनही कधीही केली नाही, हा त्यांचा गुण नवपिढीला मार्गदर्शक ठरेल.

सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याबरोबरच तात्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तितकेच महत्त्व दिले. त्यांना वेळ दिला आणि आपली पुढील पिढी कशी सर्वगुणसंपन्न बनेल त्या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार केले. तात्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. एक मुलगा राजेंद्र शेती व्यवसाय व सामाजकारण आहे. दुसरा मुलगा अविनाश व स्नुषा प्रतिभा डॉक्टर आहेत. तिसरा मुलगा विजय हा तात्यांचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक वारसा जपत आहेत.

तात्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी माझा लहानपणीपासूनच अतिशय घनिष्ठ संबंध आहे. माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यामागे तात्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा कारणीभूत आहे. तात्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या मुलांवर सुसंस्कार केले त्याच पद्धतीने माझ्यासारख्या अनेक युवकांवर त्यांनी चांगले सुसंस्कार दिले. त्यामुळेच गावच्या सर्व लोकांच्या हृदयात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले.

- प्राचार्य शंकर पाटील, - अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ एज्युकेशन, आष्टा